
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Gaurav Khanna -Akanksha Chamola: नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो ‘लॉक अप २’ सध्या विविध खुलास्यांमुळे चर्चेत आहे. नुकतेच अभिनेत्री आकांक्षा चमोलाने शोमध्ये ती आणि तिचा पती गौरव खन्ना घटस्फोट घेत असल्याचा खुलासा केला. याचबरोबर तिने आपण बायसेक्शुअल (उभयलिंगी) असल्याचेही सांगितले. या खुलाशांनंतर आता शोमध्ये पाहुणा म्हणून सहभागी झालेल्या गौरव खन्नाच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
शोमध्ये गौरवने आकांक्षासोबतच्या नात्यावर मोकळेपणाने भाष्य केले. तो म्हणाला, “सध्या हीच सर्वात मोठी बातमी बनली आहे. आम्ही मे महिन्यात घटस्फोटाबाबत चर्चा केली होती, पण लोकांना वाटतं आमचा घटस्फोट वर्षभरापूर्वीच झाला आहे.”
पुढे तो म्हणाला, “काही जण म्हणत आहेत की ती ‘बिग बॉस’साठी ऑडिशन देत होती आणि मी सहानुभूती मिळवण्यासाठी हे करत आहे. प्रत्येकालाच या प्रकरणावर बोलायचं आहे. लोकांच्या प्रतिक्रियेमुळे मला खूप आश्चर्य वाटलं. कायदेशीरदृष्ट्या तू अजूनही माझी पत्नी आहेस.”
Well said GK ye aurat khel gayi tumhare saath 10 saal 🥺 More power to u Man🫶 U deserve all the happiness n success 🫂#GauravKhanna pic.twitter.com/Cc3EQMIRmV — Bharti💝 (@CurlyTales_20) July 9, 2026
संवादादरम्यान आकांक्षा भावूक होऊन रडू लागली. त्यावेळी गौरवने तिला धीर देत खंबीर राहण्याचा सल्ला दिला आणि शो जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्यानंतर आकांक्षाने, “मी हा शो जिंकू शकते का?” असा प्रश्न विचारला. त्यावर फराह खानने तिला खेळाबाबत कोणत्याही सल्ल्याची गरज नसल्याचे म्हटले.
यावेळी गौरवने मिश्कील अंदाजात म्हटले, “तुला काय वाटतं, मला माहीत नाही? जी माझ्यासोबत १० वर्षे खेळली आहे, ती कोणताही शो जिंकू शकते.” त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी गौरवला पाठिंबा दिला, तर काहींनी दोघांनाही त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आकांक्षा चमोला आणि गौरव खन्ना यांनी २०१६ मध्ये विवाह केला होता. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली होती. टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, आता त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.