
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सुप्रसिद्ध सोशल मीडिया व्यक्तिमत्वे आवेज दरबार आणि नगमा मिराजकर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. नगमा आणि आवेज या दोघांनी सलमान खानच्या ‘बिग बॉस १९’ या शोमध्ये एकत्र भाग घेतला होता. शो दरम्यान, आवाज आणि नगमा यांनी सांगितले की ते एकमेकांना १० वर्षांपासून ओळखतात आणि त्यांचे नाते कधी जुळले तर कधी तुटले आहे. मात्र, याच शोमध्ये आवेजने नगमाला लग्नासाठी प्रपोज केले होते. काही काळापूर्वी, ईद नंतर दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, आता असे दिसते की नगमा आणि आवेज वेगळे झाले आहेत. या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
कधी फोटोसाठी पैसे घेणारा Orry आता LPG साठी करतोय मागणी; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
‘बिग बॉस १९’ चा स्पर्धक आणि कंटेंट क्रिएटर आवेज दरबारने सोमवारी आपला ३३ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्याने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते, ज्याला अनेक प्रमुख टीव्ही व्यक्तिमत्त्वांनी हजेरी लावली. मात्र, सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे त्याची गर्लफ्रेंड, नगमा मिराजकरची अनुपस्थिती. नगमा आवेज दरबारच्या पार्टीला आली नाही, तसेच तिने सोशल मीडियावर त्याला शुभेच्छाही दिल्या नाही आहेत. आता नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की, त्या दोघांचे ब्रेकअप झाले आहे का? याचे उत्तर घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
आवेजच्या पार्टीत नगमा अनुपस्थित
१६ मार्च रोजी आवेजच्या वाढदिवसाच्या पार्टीला त्याचे मित्र, कुटुंबीय आणि बिग बॉस १९ चे अनेक स्पर्धक उपस्थित होते. मात्र, नगमा या पार्टीत मात्र दिसली नाही. इतकेच नाही, तर तिने सोशल मीडियावर आवेजला शुभेच्छाही दिल्या नाहीत. यामुळे नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नक्की काय प्रकरण आहे आणि त्यांचे आता ब्रेकअप झाले आहे का. यापूर्वी, फरहाना भट्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत बिग बॉस १९ चे अनेक स्पर्धक दिसले होते, पण नगमा आणि आवेज वेगवेगळे आले होते.
लोकांनी दिल्या प्रतिक्रिया
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले, “नगमा आणि आवेजसोबत काय झाले? ते फरहानाच्या वाढदिवसाच्या पार्टीला वेगवेगळे आले होते, आणि आता नगमा आवेजच्या वाढदिवसाच्या पार्टीला आली नाही, तसेच तिने त्याला सोशल मीडियावर शुभेच्छाही दिल्या नाहीत.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, “आवेज आणि नगमासाठी वाईट वाटत आहे. ऐकले आहे की १० वर्षांच्या नात्यानंतर/मैत्रीनंतर किंवा जे काही असेल त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले आहे. आशा आहे की ते पुन्हा एकत्र येतील आणि हा प्रसिद्धीचा स्टंट नसेल.”