
(फोटो- सोशल मिडिया)
Nikhil Nanda Creates History : गेल्या काही काळात भारतीय चित्रपटसृष्टीत असे काही निर्भीड आणि धाडसी चित्रपट आले आहेत, ज्यांनी समाजातील कटू सत्य आणि संवेदनशील विषय कोणत्याही भीतीशिवाय प्रेक्षकांसमोर मांडले. धाडसी दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या बळावर उभ्या राहिलेल्या या चित्रपटांनी ठरावीक चौकट मोडण्याचे साहस दाखवले असून भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. समाजाला हादरवणारे, नव्या चर्चांना वाव देणारे आणि आपल्या काळाचे प्रतिबिंब दाखवणारे चित्रपटच कायम स्मरणात राहतात.
NH Studioz कडे Kaun Banega Crorepati चे प्रसारण हक्क! आता ‘या’ नव्या वेळेत होणार प्रसारण
‘आखरी सवाल’ या चित्रपटाच्या माध्यमातून निखिल नंदा आता देशात मोठी वैचारिक चर्चा निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत सामील झाले आहेत. ते ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द केरळ स्टोरी’, ‘आर्टिकल ३७०’ आणि ‘धुरंधर’सारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या रांगेत उभे राहिले आहेत. हा चित्रपट आजच्या काळातील त्या निर्भीड भारतीय सिनेमाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे, ज्याचा उद्देश केवळ मनोरंजन नसून समाजाला खोल आणि दूरगामी संदेश देणे हा आहे.
आपल्या धारदार विचारसरणी आणि निर्भीड कथांसाठी ओळखले जाणारे निडर चित्रनिर्माते निखिल नंदा यांच्या ‘आखरी सवाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संवेदनशील ऐतिहासिक संदर्भांवर आधारित ही कथा अत्यंत प्रभावी आणि राजकीयदृष्ट्या तीव्र स्वरूपाची आहे. आपल्या धाडसी कथनशैलीमुळे या चित्रपटाने समाजात नवी चर्चा निर्माण केली असून, सत्याधारित आणि प्रभावी कथा मांडण्याच्या निखिल नंदा यांच्या भूमिकेला अधिक बळ दिले आहे. या चित्रपटामुळे ते अशा प्रभावशाली चित्रनिर्मात्यांच्या गटात सामील झाले आहेत, ज्यांचे चित्रपट दीर्घकाळ स्मरणात राहतात.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट १९८० च्या उत्तरार्धात आणि १९९० च्या सुरुवातीला काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या झालेल्या वेदनादायी पलायनावर आधारित आहे. अत्यंत संवेदनशील आणि भावनिक विषयाला या चित्रपटाने प्रामाणिकपणे मोठ्या पडद्यावर आणले. या चित्रपटामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आणि प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम झाला.
‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाने एका संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयाला अत्यंत धाडसी पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले. दिग्दर्शक आदित्य सुहास जंभळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यामागील घटनाक्रम आणि गुप्त कारवायांचे पैलू उलगडण्यात आले आहेत. राजकीय नाट्य आणि थरार यांचा प्रभावी संगम या चित्रपटात पाहायला मिळतो.
निर्माते विपुल अमृतलाल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या ‘द केरळ स्टोरी’ तसेच कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड’ या चित्रपटांनी आपल्या निर्भीड पटकथेमुळे अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त विषय पडद्यावर आणला. महिलांचे धर्मांतर, मानसिक प्रभाव टाकणे आणि अतिरेकी विचारसरणीच्या जाळ्यात अडकण्यामागील वास्तव या चित्रपटांत दाखवण्यात आले असून, त्यावर देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि वाद निर्माण झाले.
आदित्य धर दिग्दर्शित गाजलेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाची कथा दहशतवाद आणि देशाच्या गुप्त मोहिमांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ‘हमजा’ नावाच्या एका गुप्तहेराभोवती ही कथा फिरते, जो राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या जाळ्यांमध्ये शिरून देशाचे रक्षण करतो. वास्तववादी आणि पकड घेणाऱ्या कथनशैलीमुळे या चित्रपटाने व्यापक चर्चा निर्माण केली आणि इतिहासातील गुंतागुंतीच्या तसेच वादग्रस्त विषयांकडे प्रेक्षकांना नव्या दृष्टीने पाहण्यास भाग पाडले.