
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेता राजपाल यादव यांना जामीन नाकारला. चेक-बाउन्स प्रकरणाची सुनावणी दुपारी २:३० वाजता पुन्हा सुरू झाली तेव्हा, अभिनेत्याच्या वकिलाच्या विनंतीवरून न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज सोमवारपर्यंत पुढे ढकलला आहे. प्रतिवादीला नोटीस बजावण्यात आली आहे. याआधी, न्यायालयाने अभिनेत्याला फटकारले आणि स्पष्टपणे म्हटले की, “तुम्ही तुमचे वचन पाळले नाही म्हणून तुरुंगात गेला आहात.” एकूण, राजपाल यादव यांना तिहार तुरुंगात आणखी चार रात्री काढाव्या लागतील.
न्यायालयाच्या फटकारानंतर राजपाल यादव यांनी ५ फेब्रुवारी रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. हा खटला २०१० मध्ये “आता पता लापता” या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे. बॉलीवूड अभिनेत्याने कौटुंबिक लग्नाला उपस्थित राहण्याची गरज असल्याचे कारण देत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
वकिलाने सांगितले, “प्रकरण सोमवारपर्यंत पुढे ढकलले पाहिजे. आपण काहीतरी निष्कर्ष काढू.” सकाळच्या कामकाजानंतर, दुपारी २:३० वाजता सुनावणी पुन्हा सुरू झाली तेव्हा अभिनेत्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले, “आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. आम्ही जामीन अर्ज दाखल केला आहे. दुसऱ्या बाजूने उत्तर मागता येईल. खटला सोमवारपर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो. तोपर्यंत मी काहीतरी निष्कर्ष काढेन.” न्यायालयाने खटला सोमवारपर्यंत पुढे ढकलला असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
न्यायालयाने तक्रारदाराला सांगितले, “तुम्हाला जामीन अर्जावर उत्तर दाखल करावे लागेल. मी फाइल पाहत असताना, अशा अनेक गोष्टी होत्या ज्या आम्हाला माहिती नव्हत्या. त्याने सर्वोच्च न्यायालयात मागील आदेशाला आव्हान दिले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला कोणताही दिलासा दिला नाही. असो, आम्ही सोमवारी यावर चर्चा करू.” असे त्यांनी म्हटले आहे.
‘द केरल स्टोरी’ सीक्वलवर चर्चा; निर्मात्याने कडक सुरक्षेत केले शूटिंग, धमक्यांबद्दलही उघड केले सत्य
चेक बाउन्स प्रकरण नक्की काय?
अभिनेत्याचे हे सगळे प्रकरण, ही कायदेशीर लढाई २०१० मध्ये सुरू झाली आहे. जेव्हा राजपाल यादव यांनी त्यांच्या “आता पता लापता” चित्रपटासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला, ज्यामुळे राजपाल यादव यांना गंभीर आर्थिक अडचणी आणि कर्ज फेडण्यात अडचणी येत होत्या.