
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
नमित मल्होत्रा यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘रामायण’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारी ही भव्य दोन भागांची चित्रपटमालिका प्रेक्षकांसमोर एका नव्या रुपात येत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातून रणबीर कपूरचा भगवान रामाच्या रूपातील पहिला लूक समोर आला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
प्राइम फोकस स्टुडिओज निर्मित या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हिज्युअल इफेक्ट्स वापरण्यात येत आहेत. आठ वेळा अकादमी पुरस्कार विजेता VFX स्टुडिओ DNEG आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने हा प्रकल्प उभारला जात आहे. २ एप्रिल २०२६ रोजी या चित्रपटातील ‘राम’ या पात्राची पहिली झलक अधिकृतरीत्या सादर करण्यात आली. जी पाहून चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
भारतासह परदेशातही Dhurandhar 2 घालतोय धुमाकूळ; 14 व्या दिवशी चित्रपटाची कोटींची कमाई
ही कथा केवळ पौराणिक नाही, तर आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे. राम हा कर्तव्य, त्याग आणि नैतिकतेचे प्रतीक मानला जातो. आपल्या इच्छांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणारा आणि योग्यतेसाठी सर्व काही त्याग करण्यास तयार असलेला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ राम आजही प्रेरणादायी ठरतो. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या मते, ‘रामायण’ ही फक्त चांगले आणि वाईट यांच्यातील लढाई नसून निर्णय, त्याचे परिणाम आणि योग्य गोष्ट करण्याच्या जबाबदारीची कथा आहे.
रामाच्या भूमिकेबद्दल बोलताना रणबीर कपूर यांनी सांगितले की, ते या भूमिकेत केवळ अभिनय करत नाहीत, तर रामाच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते, रामाचे साधेपण आणि शुद्धता ही अत्यंत दुर्मिळ असून, ती समजून घेणे हा एक नम्र करणारा अनुभव आहे. चित्रपटात दमदार कलाकारांची स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबे आणि हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल दिसणार आहेत. तसेच संगीतासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचेहंस झिमर आणि ए.आर. रहमान यांची जोडी लाभली आहे.
Sourav Ganguly यांच्या बायोपिकचे शीर्षक जाहीर; Rajkummar Rao ने केली शूटिंगला सुरुवात
‘रामायण: भाग १’ हा चित्रपट दिवाळी २०२६ मध्ये जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार असून, त्याचा दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हजारो वर्षांपासून जपली गेलेली ही कथा आता आधुनिक तंत्रज्ञानासह नव्या पिढीसमोर सादर होत असून, भारतीय संस्कृतीचा गौरव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर झळकणार आहे.