
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आदित्य धरच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने प्रदर्शित होताच त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. समीक्षक असोत किंवा टीकाकार, प्रत्येकजण ‘धुरंधर २’ बद्दलच बोलत आहे. बॉलीवूडपासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंतचे कलाकार ‘धुरंधर २’, त्याची निर्मिती, कलाकारांचा अभिनय आणि आदित्य धरच्या दूरदृष्टीचे सातत्याने कौतुक करत आहेत. अल्लू अर्जुनपासून ते राम चरण, एस.एस. राजामौली आणि महेश बाबूपर्यंत अनेक कलाकारांनी ‘धुरंधर २’ वर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि आता ‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘कांतारा’साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या ऋषभ शेट्टीने अलीकडेच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ पाहिला आणि तो त्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. त्याने आपल्या एक्स (X) अकाउंटवर एक मोठी पोस्ट लिहिली, ज्यामध्ये ऋषभ शेट्टीने आदित्य धरची भरभरून प्रशंसा केली आहे. त्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर प्रेमाचा वर्षाव केला आणि तो कलाकारांच्या अभिनयाचा चाहता बनला.
अखेर ममता कुलकर्णीने सोडला संन्यासाचा मार्ग? गोव्यात दिसला नवा लूक; सोशल मीडियावर टीकेचा भडीमार
ऋषभ शेट्टी ‘धुरंधर २’चा झाला चाहता
ऋषभ शेट्टीने आदित्य धर यांना टॅग करत X वर लिहिले, “‘धुरंधर: द रिव्हेंज’चा पहिलाच सीन प्रेक्षकांना खिळवून ठेवतो आणि शेवटपर्यंत पकड कायम ठेवतो. प्रत्येक फ्रेम युद्धाच्या नगाऱ्यासारखी गाजत आहे. हा फक्त सिक्वेल नाही, तर एक दमदार स्टेटमेंट आहे. अप्रतिम कथा आणि डिटेलिंग पाहून खूप आनंद झाला, भाऊ!” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
#DhurandharTheRevenge the very first scene pulls you in and never lets go. Every frame hits like a war drum. This isn’t just a sequel; it’s a statement. Brilliant storytelling, brother absolutely loved the detailing, @AdityaDharFilms. Top-notch performances by every single… pic.twitter.com/ugT7KkksMJ — Rishab Shetty (@shetty_rishab) March 21, 2026
ऋषभ शेट्टीने ‘धुरंधर २’ च्या संपूर्ण टीमला केला सलाम
ऋषभ शेट्टीने पुढे लिहिले, “चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने अप्रतिम कामगिरी केली आहे. आर. माधवन सर, अर्जुन रामपाल, रणवीर सिंग, राकेश बेदी, सारा अर्जुन आणि संजय दत्त सर यांना सलाम. विकास नवलखा यांचे त्यांच्या उत्कृष्ट सीनसाठी आणि ज्या तंत्रज्ञांनी चित्रपटाला इतके अप्रतिम बनवले त्यांचे अभिनंदन! तसेच संगीतासाठी शशवत सचदेव आणि संपादनासाठी शिवकुमार व्ही. पणिकर यांचेही अभिनंदन.”
आदित्य धरने ऋषभ शेट्टीचे मानले आभार मानले
आदित्य धरने त्यावर प्रतिक्रिया देत लिहिले, “तुमचे शब्द माझ्यासाठी खूप खास आहेत.” जेव्हा आदित्य धरने ऋषभ शेट्टीला त्याचे आणि ‘धुरंधर २’ चे कौतुक करताना ऐकले, तेव्हा त्याने आभार व्यक्त करत लिहिले, “भावा, तुमच्या कौतुकाचा खूप अर्थ आहे. मी स्वतः कांताराचा खूप मोठा चाहता आहे, त्यामुळे तुमचे शब्द माझ्यासाठी आणखीनच खास आहेत. मी खूप आभारी आहे.”