
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी अलीकडेच भारतातील चित्रपटांच्या मूल्यमापनातील दुहेरी निकषांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, अत्यंत हिंसाचार असलेले चित्रपट तपासणीशिवाय पास केले जातात, परंतु वास्तविक जीवनावर आधारित चित्रपटांना प्रचाराचे लेबल लावले जाते आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीसी) त्यांना आक्षेप घेते. आता दिग्दर्शक नक्की काय म्हणाले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
सुदीप्तो सेन यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळावर (CBFC) दुहेरी निकषांचा अवलंब केल्याचा आरोप करत तीव्र टीका केली आहे. ‘द केरळ स्टोरी 2’ आणि त्यांच्या आगामी ‘चरक’ या चित्रपटांना ‘प्रचारात्मक’ ठरवले जात असताना, हिंसा आणि रक्तपाताचे सीन करणारे ‘एनिमल’ आणि ‘धुरंधर’सारखे चित्रपट मात्र विनाअडथळा प्रदर्शित कसे होतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Sonal Chauhan: दुबई विमानतळावर अडकली बॉलीवूड अभिनेत्री; थेट पंतप्रधान मोदींकडे केले मदतीचे आवाहन
सुदीप्तो सेन यांनी सेन्सॉर बोर्डावर केली टीका
IANS नुसार, ते म्हणाले, “आमच्या सेन्सॉर बोर्डाचे एक प्रकारचे दुहेरी मानक आहेत. बरेच नियम दशके जुने आहेत. सिनेमॅटोग्राफ कायदा स्वतः १९५२ चा आहे. काही वर्षांपूर्वी, सेन्सॉर बोर्डाने श्याम बेनेगल समितीच्या अहवालातील शिफारशी स्वीकारल्या, परंतु अद्याप कायदे पूर्णपणे अंमलात आणलेले नाहीत. “चरक” मध्ये अंजली पाटील, सहिदुर रहमान, सुब्रत दत्ता, शशी भूषण, नलनीश नील, शंखदीप आणि शौनक श्यामल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. ट्रेलरने चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे.
‘द केरळ स्टोरी’ चे एकूण कलेक्शन
दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना २०२३ मध्ये ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर प्रसिद्धी मिळाली. अदा शर्माची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ३०२ कोटींची कमाई केली. चित्रपट निर्मात्याला ‘द केरळ स्टोरी’ साठी २०२५ चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला.