
फोटो सौजन्य - Social Media
शूटिंग थांबवण्यामागचे कारण आर्थिक अडचण देण्यात आली आहे. छत्रपतींच्या भूमिकेसाठी अभिनेता अक्षय कुमारची निवड करण्यात आली आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता आहे. पण काही सिनेचाहत्यांनी याविषयी संमिश्रे प्रतिक्रिया दिल्या होत्या.
वाढत्या निर्मिती खर्चामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे चित्रपटाचे चित्रीकरण अर्धवट थांबवावे लागले आहे. काही भागांचे शूटिंग पूर्ण झाले असले तरी उर्वरित काम सध्या रखडले असून निर्मात्यांसमोर बजेटचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती Wasim Qureshi करत असून, कलाकारांची दमदार फळी असल्यामुळेही तो चर्चेत होता. जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, नवाब खान आणि Pravin Tarde यांसारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
एकंदरीत, भव्य ऐतिहासिक कथानक आणि प्रभावी स्टारकास्ट असूनही ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ आर्थिक कारणांमुळे सध्या ठप्प झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.