(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
निर्मात्यांनी अधिकृतपणे ‘आखरी सवाल’च्या ट्रेलर प्रकाशनाची घोषणा केली आहे. हा ट्रेलर ३० एप्रिल २०२६ रोजी एका भव्य सोहळ्यात संपूर्ण कलाकार आणि तांत्रिक पथकाच्या उपस्थितीत प्रदर्शित केला जाणार आहे.
आजच्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीत बहुतांश वेळा मसालेदार आणि व्यावसायिक चित्रपटांनाच प्राधान्य दिले जाते. अशा वेळी निखिल नंदा यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार केला आहे. ‘आखरी सवाल’च्या माध्यमातून त्यांनी देशाच्या इतिहासातील त्या पानांना स्पर्श केला आहे, ज्यांवर फार कमी चर्चा झाली आहे. बाबरी मशीद पाडण्याची घटना, महात्मा गांधी यांची हत्या आणि आणीबाणी यांसारख्या विषयांना थेटपणे मांडत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये अशा विषयांवर फार कमी काम झाले आहे, पण निखिल नंदा यांच्या धाडसामुळे हे विषय आता प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना देशाच्या भूतकाळातील महत्त्वाच्या घटनांचा विचार करण्याची आणि त्यांना समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
‘आखरी सवाल’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. निखिल नंदा यांनी सादर केलेल्या या चित्रपटाची निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी संयुक्तपणे केली आहे. तर पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
Bigg Boss Marathi संपला, आता ‘या’ मराठी Reality Show ची पाळी! महाअंतिम सोहळा ठरणार आकर्षक






