Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial : ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा अंतिम अध्याय सुरु; स्वामींचे महानिर्वाणाचे गूढ संकेत !

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत कथानक अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक टप्प्यावर पोहोचत आहे. या कालावधीत स्वामी समर्थ अचानक एका रात्री स्थानावरून नजरेआड होतात आणि सेवेकऱ्यांना ते स्मशानभूमीत दिसतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 23, 2026 | 05:54 PM
Marathi Serial : ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा अंतिम अध्याय सुरु; स्वामींचे महानिर्वाणाचे गूढ संकेत !
Follow Us
Close
Follow Us:
  • ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा अंतिम अध्याय सुरु,
  • स्वामींचे महानिर्वाणाचे गूढ संकेत !
कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत कथानक अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक टप्प्यावर पोहोचत आहे. या कालावधीत स्वामी समर्थ अचानक एका रात्री स्थानावरून नजरेआड होतात आणि सेवेकऱ्यांना ते स्मशानभूमीत दिसतात. सुंदरा हादरून त्यांना प्रश्न विचारते, तेव्हा स्वामी म्हणतात की, “वेळ आली आहे. आता आम्हाला उंच जायचं आहे” असे सूचक शब्द बोलतात. हे शब्द स्वामींच्या महानिर्वाणाचे संकेत आहेत का, या विचाराने सेवेकरी अस्वस्थ होतात आणि स्वामींना नजरेआड होऊ न देण्याचा निर्णय घेतात. मात्र स्वामी आपल्या मर्जीनुसार वागतात आणि “हमने हमारा नया ठिकाना बना लिया है” असे सांगून सगळ्यांची उत्सुकता आणखी वाढवतात.

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवा अध्याय; श्रद्धा नेमकी कोणती? स्वामींनी दिला मोलाचा सल्ला

आगामी भागात स्वामी समर्थ जमिनीवर झोपण्याचा निर्णय घेतात, भक्तांच्या यादी तयार करतात आणि अचानक प्रकटलेल्या शिवलिंगाशी संवाद साधतात.यामुळे ही कथा गूढ थरारक वळण घेते. सुंदरा, कपिला आणि सेवेकऱ्यांमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होतो. पुण्यातील शिवभक्त नंदराम गवंडी यांची कथा, त्यांचा आजार, स्वामींचा अंगारा आणि पुढे घडणारी स्वामी लीला कथानकाला आध्यात्मिक उंचीवर घेऊन जाते. स्वामी मल्लिकार्जुन रूपात दर्शन देतात तर दुसरीकडे स्वामी गोडाधोडाचा त्याग जाहीर करतात. या साऱ्या घडामोडींमधून महानिर्वाणाकडे जाण्याचे गूढ संकेत स्वामी देत आहेत. हा अंतिम टप्यातील म्हणजेच स्वामींच्या महानिर्वाणाचा सुरु झालेला अध्याय मृत्यूबाबतचं सत्य समजावून सांगत आहे.

जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या सुरुवातीपासून ते अगदी आता अंतिम टप्प्यापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांची लोकप्रियता टिकवून ठेवली, मालिकेतून स्वामींचे विचार स्वामींनी भक्तांना दिलेली शिकवण यामुळे मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात, अनेकदा आपण नैराश्यात जातो, रागावर नियंत्रण राहत नाही अनेकदा आपल्याही नकळत खूप जणांना दुखावतो त्यावर स्वामी सांगतात की, तुमचे कर्म, मन आणि हेतू स्वच्छ ठेवा. तुमचं चांगलं करण्यासाठी आम्ही आहोत. म्हणूनच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ एक वाक्य नाही तर ते स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेलं वचन आहे आणि आजही स्वामींच्या जाण्यानंतर देखील त्यांच सत्व त्यांच्य़ा भक्तांना कायम जाणवतं. स्वामी शरीराने नसले तरी त्यांचं अस्तित्व त्यांच्या भक्तांच्या पाठीशी कायमच आहे.

”पैसे नव्हते.., ३ वर्ष काम बंद”, अमृताने सांगितला अनुभव, म्हणाली; ”स्वामींना सॉरी म्हटलं, कारण…”

Web Title: Coloursmarathi serial marathi serial the final chapter of the serial jai jai swami samarth begins the mysterious sign of swamis mahanirvana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • marathi serial news
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

अखेर अपूर्वा आणि अंशुमनची बांधली रेशीमगाठ! वधू- वराचे लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
1

अखेर अपूर्वा आणि अंशुमनची बांधली रेशीमगाठ! वधू- वराचे लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

Star Pravah च्या ‘Anandi’साठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला; दोन दिग्गज कलाकारांचं पुनरागमन, प्रोमोला २ मिलियन व्ह्यूज
2

Star Pravah च्या ‘Anandi’साठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला; दोन दिग्गज कलाकारांचं पुनरागमन, प्रोमोला २ मिलियन व्ह्यूज

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेत मोठा ट्विस्ट; समीर-अर्पिताच्या आयुष्यात येणार लग्नाचं नवं वळण
3

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेत मोठा ट्विस्ट; समीर-अर्पिताच्या आयुष्यात येणार लग्नाचं नवं वळण

सावित्रीबाई-जोतीरावांच्या आयुष्यातील नवा अध्याय; अभिषेक देशमुख आणि राजसी भावे झळकणार प्रमुख भूमिकेत
4

सावित्रीबाई-जोतीरावांच्या आयुष्यातील नवा अध्याय; अभिषेक देशमुख आणि राजसी भावे झळकणार प्रमुख भूमिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.