
'Saubhagyavati Vrinda Mohan' Marathi Serial Set- (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
या दोघांची मैत्री आजची नाही. अनेक वर्षांपूर्वी ठाण्यात राहत असताना त्यांची ओळख झाली. परिसरात भेटीगाठी, चहाच्या कट्ट्यावरच्या गप्पा आणि छोट्या- मोठ्या भेटींमधून त्याच्यांत विश्वासाचं नातं निर्माण झालं. काळ बदलला, कामं बदलली मात्र त्यांच्यामधलं मैत्रीणीचे नाते तसचं टिकून राहिलं. आता एकाच मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्याने ही मैत्री आणखी घट्ट झाली आहे.
शूटिंगच्या धावपळीतही दोघे वेळ काढून एकमेकांसोबत धमाल करतात. सेटवरचं वातावरण हलकं-फुलकं ठेवण्यासाठी ते सतत काहीतरी मजेशीर करत असतात. विशेष म्हणजे गाण्यांवर तयार केलेले त्यांचे रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्यांच्या सहज अभिनयामुळे आणि नैसर्गिक अंदाजामुळे हे व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतात. (Entertainment News:)
संग्रामच्या मते, आशिषचा स्वभाव हा त्याचा सर्वात मोठा गुण आहे. तो नेहमी आनंदी, उत्साही आणि सगळ्यांशी प्रेमाने वागणारा आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना कोणताही ताण जाणवत नाही. रोजच्या शूटिंगमध्ये नवीन कल्पना सुचवणे, गाण्यांची निवड करणे आणि प्रेक्षकांना आवडेल असं काहीतरी वेगळं करण्याचा दोघांचाही प्रयत्न असतो.
दोघांच्या आवडी-निवडी अनेक बाबतीत वेगळ्या असल्या तरी त्याच वेगळेपणामुळे त्यांची मैत्री अधिक मजबूत झाली आहे. एकमेकांच्या मतांचा आदर करणं, गरज पडल्यास साथ देणं आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं, ही त्यांच्या नात्याची खास ओळख आहे. त्यामुळेच पडद्यामागची त्यांची मैत्री प्रेक्षकांनाही भावते.
फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने संग्रामने या खास नात्याबद्दल भावना व्यक्त करताना सांगितलं की, आयुष्यात चांगले मित्र मिळणं हे नशीबाचं असतं. मालिकेमुळे त्याला केवळ एक सहकलाकार मिळाला नाही, तर कायम साथ देणारा विश्वासू मित्र मिळाला. भविष्यातही ही मैत्री अशीच कायम राहावी आणि दोघांनी एकत्र आणखी चांगलं काम करावं, अशी त्याची मनापासून इच्छा आहे.
‘सनई चौघडे’मुळे पुन्हा बहरली मेघना एरंडे जोशी-अदिती सारंगधर यांची कॉलेजमधील मैत्री
आजच्या स्पर्धेच्या काळात कलाकारांमध्ये खरी मैत्री टिकून राहणं ही दुर्मिळ गोष्ट मानली जाते. मात्र संग्राम समेळ आणि आशिष जोशी यांनी ही गोष्ट चुकीची ठरवली आहे. त्यांच्या नात्यात दिखावा नाही, तर जिव्हाळा आहे. म्हणूनच त्यांच्या मैत्रीची चर्चा फक्त सेटवरच नाही, तर चाहत्यांमध्येही रंगताना दिसते. पडद्यावरची जोडी आणि पडद्यामागचं मैत्रीचं नातं या दोन्ही गोष्टींमुळे हे दोघे आज प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करत आहेत.