
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ हा मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, त्याच्या कथेसोबतच गाण्यांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील ‘अंगाई’ हे नव्याने प्रदर्शित झालेले गाणे विशेष चर्चेत असून, मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांनंतर एक हळवे, मनाला भिडणारे अंगाई गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
‘निजूनी गेला दिस कधीचा.. चांद हा येता.. पापण काठी तरली नीज.. थांबव चाळा.. ममता ओली, कुस उतावीळ.. नीज रे बाळा..’ अशा भावपूर्ण ओळींनी सजलेले हे गाणे सध्या सर्वत्र गाजत आहे. या गाण्यामुळे चित्रपटगृहात एक भावनिक वातावरण निर्माण होत असून, अनेक प्रेक्षक या गाण्यादरम्यान भारावून जात आहेत. आणि हे गाणं प्रेक्षकांना पसंत देखील पडले आहे.
‘बम ल्यारी में फूटा…’, Zakir Khan चा इंडस्ट्रीवर थेट टोला; धुरंधरचे यश पचवता येणार नाही
या गाण्याला प्रसिद्ध गायक स्वानंद किरकिरे यांच्या भावस्पर्शी आवाजाची जोड लाभली आहे, ज्यामुळे गाण्याचा परिणाम अधिकच प्रभावी झाला आहे. कुणाल-करण यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला त्यांनीच संगीत दिले असून, आईच्या मायेचा, नात्यांतील जिव्हाळ्याचा आणि प्रेमाच्या कोमल भावनांचा सुंदर आविष्कार यातून साकारला आहे.
चित्रपटातील शशांक शेंडे यांच्या प्रभावी अभिनयामुळे कथेला अधिक बळ मिळाले आहे. विशेषतः ‘अंगाई’ गाण्याच्या प्रसंगात अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळत आहे, ज्यामुळे या गाण्याचा भावनिक प्रभाव स्पष्ट होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी या गाण्याबद्दल बोलताना सांगितले की, “हे अंगाई गीत माझ्यासाठी अत्यंत खास आहे. लहानपणी ऐकलेल्या अंगाई गीतांच्या आठवणी, आईची माया आणि त्या काळातील निरागसता पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न या गाण्यातून केला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात हरवलेली नात्यांची ऊब प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती.”
‘बॉर्डर 2 नंतर सिनेमागृहात पुन्हा एकदा धमाका करायला Sunny Deol सज्ज, नव्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट
झी स्टुडिओज सोबत नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ या चित्रपटात निर्मिती सावंत, ललित प्रभाकर, विदुला चौगुले, हृषीकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके आणि प्रतीक्षा कोटे यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. एकंदरीत, ‘सुपर डुपर’मधील ‘अंगाई’ हे गाणे केवळ एक संगीत अनुभव नसून, प्रत्येकाच्या मनातील आईच्या आठवणींना उजाळा देणारा भावनिक प्रवास ठरत आहे.