
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘आणि काय हवं’ या लोकप्रिय मालिकेनंतर आता ‘हे काय नवीन?’ मध्ये या जोडप्याचा पुढचा प्रवास पाहायला मिळणार आहे. याबद्दल बोलताना उमेश म्हणाला की, ‘पहिल्या भागात हे दोघं नवविवाहित होते. उत्साह, प्रेम आणि हलक्याफुलक्या क्षणांनी भरलेलं आयुष्य जगणारे. मात्र या नव्या भागात ते त्यांच्या आयुष्याच्या अधिक प्रगल्भ टप्प्यावर पोहोचले आहेत. चाळिशीत प्रवेश केल्यानंतर नात्यांमध्ये येणारे बदल, जबाबदाऱ्या, वास्तवातील समस्या आणि त्यांना सामोरं जाण्याची पद्धत याचं वास्तववादी चित्रण या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. या प्रवासाची खासियत म्हणजे, हे जोडपं प्रत्येक परिस्थितीला एकत्र, थोड्या विनोदाने आणि उबदारपणाने कसं सामोरं जातं, हे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.’ असे अभिनेत्रीने सांगितले आहे.
या सीरिजच्या मुळाशी असलेलं लेखनही तितकंच प्रभावी आहे. लेखक वरुण नार्वेकर यांच्या लेखनशैलीबद्दल बोलताना उमेश म्हणाला, साध्या आणि दैनंदिन नात्यांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी खूप वेगळी आणि खास आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतून भावनांचे बारकावे उलगडण्याची त्यांची ताकद या कथेत प्रकर्षाने जाणवते. विनोद आणि संवेदनशीलता यांचा समतोल साधत त्यांनी ही कथा अधिक जिवंत केली आहे. उमेशच्या मते, या प्रोजेक्टमुळे त्याला केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनही स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी मिळाली.
या मालिकेत उमेशसोबत प्रिया बापट पुन्हा एकदा दिसणार असून, त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची जादू पुन्हा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. वास्तव आयुष्यातील जोडी पडद्यावर साकारताना त्यांच्यातील समज आणि केमिस्ट्री अधिकच खुलून येते, हे याआधीही प्रेक्षकांनी पाहिलं आहे.
Ranbir Kapoor च्या ‘रामायण’बद्दल मोठी अपडेट, हनुमान जयंतीला दिसणार प्रभू रामाची नवी झलक
एकत्र काम करण्याच्या अनुभवाबद्दल उमेश पुढे म्हणाला, ;कथेमध्ये ते दोघं खूप व्यावसायिक पद्धतीने काम करतात. दिग्दर्शक काही सूचना देत असतील, तर ते एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. मात्र, काही प्रसंगी त्याच्यातला ‘नवरा’ पुढे येतो आणि तो प्रियाला एखादी गोष्ट सुचवतो. चित्रीकरणाच्या धावपळीत कधी कधी तणाव निर्माण होतो, पण अशा वेळी एकमेकांना समजून घेणं आणि साथ देणं महत्त्वाचं ठरतं आहे.
एका प्रसंगाचा उल्लेख करताना अभिनेता म्हणाला, ‘प्रिया थोडी अस्वस्थ झाल्यावर त्याने तिला शांत केलं आणि तिच्या कामाबद्दल आत्मविश्वास दिला हीच त्यांच्या नात्याची खरी ताकद आहे.’ असे तो म्हणाला. आता ‘हे काय नवीन?’ ही वेब सीरिज लवकरच ZEE5 वर प्रदर्शित होणार असून, नात्यांचा वास्तववादी प्रवास आणि भावनांचा सुंदर मिलाफ अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.