विड्याची पाने शरीरासाठी ठरतील वरदान! हृदयाच्या आजारांपासून ते अगदी मधुमेहापर्यंत सगळ्यांवर ठरेल प्रभावी
हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित एक विड्याचे पान खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.
विड्याच्या पानांना नागवेलीचे पान असे सुद्धा म्हंटले जाते. ही एक भारतीय पारंपरिक वनस्पती आहे. सर्व प्रकारच्या आजारांवर नागवेलीचे पान गुणकारी ठरते.
विड्याच्या पानांमध्ये बाष्पशील तेल, अमिनो ऍसिड ,कार्बोहायड्रेट, विविध जीवनसत्व, अँटिऑक्सिडेंट आणि दाहक विरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
नागवेलीचे पान आणि खोबऱ्याच्या तेलाचा तांबूल म्हणून सुद्धा वापर केला जातो. ही औषधी वनस्पती शरीरासाठी कायमच प्रभावी ठरते. विड्याच्या पानांचे सेवन केल्यास अपचन होत नाही.
नागवेलीची पान चावून खाल्ल्यास पचन सुधारते, सर्दी-खोकला कमी होतो, मुरुम-डाग दूर होतात. कारण या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट व अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात.