छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान. आजही महाराजांचे चरित्र लाखो लोकांना प्रेरणा देत असतात. मात्र, शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचे खरे साक्षीदार कोण असतील तर ते महाराजांचे गडकिल्लेच ! परंतु,आज अनेक गड-किल्ल्यांची दुरावस्था पाहवत नाही. अशातच, एक आनंदाची बातमी समोर आली. युनेस्कोकडून शिवरायांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले. यामुळे शिवप्रेमींमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र, यामुळे कोणता बदल होणार? चला जाणून घेऊयात.
फोटो सौजन्य: iStock
जागतिक पातळीवर दाखल घेतली जाणार: युनेस्कोच्या यादीत महाराजांच्या किल्ल्यांचा समावेश झाल्याने त्यांना जगभर प्रसिद्धी मिळणार. यामुळे विदेशी पर्यटक त्या ठिकाणाला भेट देणार, त्याबद्दल लिहिणार आणि ब्लॉग देखील करणार.
सरकार आणि युनेस्कोकडून मदत मिळणार: शिवरायांचे गडकिल्ले जपण्यासाठी सरकार आणि युनेस्कोकडून आर्थिक, योजना, इन्फ्रास्टकचरसाठी पाठबळ मिळणार. यामुळे माहिती फलक, रस्ते, टॉयलेट्स, इत्यादी सुविधा सुधारणार.
स्थानिक लोकांचा अभिमान वाढणार: साक्षात आपले एका इतिहासाचा भाग आहे आणि त्याची दाखल युनेस्कोने घेतली ही गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब ठरेल. याच ऐतिहासिक ठिकाणाची लोकं काळजी घेण्यास सुरुवात करतील.
संस्कृती आणि निसर्ग वाचवता येतो: युनेस्कोच्या या निर्णयामुळे जुनी मंदिरं, जंगल, गुहा, आणि प्राण्यांचे जातं होईल, जे पुढच्या पिढीला सुद्धा पाहायला मिळेल.
पर्यटकांची संख्या वाढणार: देश विदेशातील लोकं हे गडकिल्ले पाहायला येणार. यामुळे गाईड, हॉटेल, टॅक्सी, फूड स्टॉलच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार मिळणार.