उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरात उष्णता वाढते. याशिवाय डिहायड्रेशन, सतत डोकेदुखी, अपचनाचा त्रास इत्यादी समस्या कायमच उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाण्यासोबत नियमित काकडी सुद्धा खावी. काकडी खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. काकडीमध्ये ९२ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, फ्लोराईड, विटामिन सी, फोलेट, कोलीन, विटामिन के आणि विटामिन ए, बीटा-कॅरोटीन व बीटा-क्रिप्टोक्झॅन्थिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीरातील पोषक मूल्य वाढवण्यासाठी आणि कायमच फ्रेश राहण्यासाठी काकडीपासून बनवलेले हे पदार्थ आवर्जून खावेत. (फोटो सौजन्य – istock)
थंडगार काकडी उन्हाळ्यासाठी ठरेल वरदान! 'हे' पदार्थ नियमित खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर काकडीचे सॅलड बनवून खावे. सॅलड बनवून खाल्ल्यामुळे इतर भाज्यांमधील पोषक घटक सुद्धा शरीराला मिळतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.

रात्री झोपण्याआधी बॉटलमध्ये दोन ग्लास पाणी, काकडीचे तुकडे आणि पुदिन्याची पाने घालून रात्रभर तसेच ठेवावे. त्यानंतर सकाळी उठल्यावर उपाशी पोटी काकडीचे पाणी प्यावे.

काकडी आणि दही यांचे एकत्र मिश्रण करून खाल्ल्यास शरीरात थंडावा टिकून राहतो. दुपारच्या जेवणात काकडी आणि दह्याचे मिश्रण खावे. यामुळे आतड्यांमध्य चांगले विषाणू तयार होतात.

दुपारच्या जेवणानंतर खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी काकडीचे ताक बनवून प्यावे. दह्यात काकडी टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर जिऱ्याची पावडर आणि काळे मीठ मिक्स करून सेवन करावे.

काकडी खाल्ल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. यामध्ये असलेले गुणकारी घटक पाण्याची कमतरता भरून काढतात आणि आरोग्य सुधारतात.






