'या' लोकांच्या आरोग्यासाठी गाजर ठरेल विषासमान
मधुमेह असलेल्या रुग्णांनी गाजर खाणे टाळावे. कारण गाजरांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.
अतिप्रमाणात गाजर खाल्ल्यास त्वचेवर पिवळेपणा वाढू लागतो. गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन आढळून येते, ज्याचे शरीरात गेल्यानंतर रूपांतर होऊन विटामिन ए तयार होते. रक्तातील कॅरोटीनची पातळी वाढल्यानंतर त्वचा पिवळी होते.
किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी गाजर खाऊ नये.गाजरातील ऑक्सलेट घटकामुळे किडनीमधील स्टोन आणखीनच वाढू लागतो, जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक मानले जाते.
गाजरांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जास्त गाजर खाल्ल्यास गॅस, जडपणा आणि अपचन वाढून डोकेदुखी, उलट्या, मळमळ इत्यादी समस्या वाढतात.
रात्रीच्या वेळी गाजर खाल्ल्यास गॅस आणि अपचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडते. त्यामुळे रात्री गाजर खाऊ नये.