राजेशाही थाटापासून सणांच्या ताटापर्यंत! राजघराण्यातील पारंपरिक घेवर मिठाईचा जाणून घ्या रंजक इतिहास
बाजारामध्ये अननस, गुलाब, बिस्कॉफ आणि चॉकलेट इत्यादी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे घेवर उपलब्ध आहेत. इतर मिठाईंच्या तुलनेत राजेशाही घेवरला बाजारात मोठी मागणी आहे.
जयपूरच्या शाही स्वयंपाकघरात घेवर मिठाईचा उगम झाला. ही मिठाई प्रामुख्याने श्रावण महिन्यात बनवली जाते. श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर सण उत्सव असतात. सणांचा गोडवा कायम टिकवून ठेवण्यासाठी घेवर मिठाई आवर्जून बनवली जाते.
घेवरची सुरुवात राजस्थानमधील राजघराण्यांच्या आणि दरबारांमधील भव्य मेजवान्यांपासून झाली होती. राज्य महाराजांच्या काळात भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास घेवर मिठाई तयार केली जायची.
राजस्थानमध्ये नवविवाहितांच्या पहिल्या गणगौर किंवा तीज सणाला माहेरहून मुलीच्या सासरकडे 'सिंजारा' पाठवला जातो. यामध्ये शगुन म्हणून घेवर दिले जाते. राजस्थनमध्ये घेवर मिठाईला महत्वपूर्ण स्थान आहे.
मेवाडच्या राणी कर्नावती यांनी मुघल सम्राट हुमायूंना संरक्षणासाठी राखी पाठवली होती. तेव्हापासून राजपुताना संस्कृतीतील शाही घेवरला विशेष स्थान मिळाले. त्यामुळे श्रीकृष्णाच्या भोगमध्ये सुद्धा घेवरचा समावेश आहे.