पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीचे आजार देखील वाढू लागतात. साथीच्या आजारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पावसाळ्यामध्ये लहान मुले आणि वयोवृद्ध लगेच आजारी पडण्याची शक्यता असते. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती गुणकारी आहेत. या वनस्पतींचा काढा प्यायल्याने आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या आयुर्वेदिक वनस्पती.(फोटो सौजन्य-istock)
आयुर्वेदिक वनस्पती
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल अतिशय प्रभावी मानली जाते. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी गुळवेल उपयुक्त आहे.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी शंखपुष्पी वनस्पतीचे सेवन केले जाते.
तुळस ही एक औषधी वनस्पती असून घरातील अंगणात तुळशीचे एक तरी रोप हे असतेच. शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुळस गुणकारी आहे.
आयुर्वेदामध्ये अश्वगंधा या वनस्पतीला विशेष महत्व आहे. ही आयुर्वेदिक वनस्पती तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी मदत करते.तसेच अश्वगंधाचे सेवन केल्याने झोपेसंबंधित समस्या दूर होतात.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी शंखपुष्पी वनस्पतीचे सेवन केले जाते.