पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. डेंग्यू, मलेरिया, सर्दी खोकला, ताप यांसारख्या आजारांची लागण झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते आणि शरीरात थकवा, अशक्तपणा वाढतो. त्यामुळे पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. वारंवार हवामानात होणाऱ्या बदलांमुळे सर्दी, घसादुखी, खोकला, विषाणूजन्य ताप तर काहीवेळा उलट्या, जुलाब होऊन खूप जास्त थकल्यासारखे वाटते. अशावेळी कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी पारिजातकाच्या पानांचा वापर करून बनवलेल्या काढ्याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

पारिजातकाच्या पानांचा काढा बनवण्यासाठी टोपात पाणी गरम करून त्यात पाणी, किसून घेतलेले आलं घाला आणि उकळी काढा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेल्या काढ्यात मध घाला.

पावसाळ्यात भिजल्यानंतर सर्दी किंवा खोकला येत असेल तर कोणतेही कफ सिरप पिण्याऐवजी पारिजातकाच्या पानांचा काढा प्यावा. यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो.

पारिजातकाच्या पानांमध्ये खूप जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

उघड्यावरील दूषित किंवा शिळ्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे जुलाब आणि उलट्या होतात. तर पोटात गॅस, ऍसिडिटी वाढून पचनक्रिया बिघडून जाते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी पारिजातकाचा काढा प्यावा.

पारिजातकाच्या पानांचा वापर पारंपरिक वैद्यकीय उपचारांमध्ये सुद्धा केला जातो. रक्तात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पारिजातकाच्या पानांचे सेवन केले जाते.






