वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
उपवासाला सुरुवात केल्यानंतर सकाळच्या वेळी सुका मेवा खावा. यामध्ये तुम्ही काजू, बदाम, मनुका किंवा सुका मेवा वापरून बनवलेली हेल्दी स्मूदी सुद्धा पिऊ शकता.
उपवासाच्या दिवशी काहीवेळा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
सफरचंद, केळी, पपई यांसारख्या फायबर युक्त फळांचे सेवन केल्यास पोट कायमच भरलेले राहील. फळे खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या अजिबात उद्भवत नाहीत.
दुपारच्या वेळी साबुदाणा वडा, बटाटा चिप्स इत्यादी तेलकट पदार्थ खाण्याऐवजी भगर किंवा राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खावेत. अतिप्रमाणात तेलकट पदार्थ खाल्ल्यास पचनक्रिया बिघडू शकते.
उपवासाच्या दिवशी रिकाम्या पोटी वारंवार चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये. अतिप्रमाणात कॅफिन युक्त पेयांचे सेवन केल्यास पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो.