रमजान महिन्यात उपवास सोडताना खजूर का खाल्ले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण
रमजान महिन्यात उपवास केल्यानंतर तो सोडताना कायमच खजूर खाल्ले जातात. खजूर खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेला अशक्तपणा आणि थकवा दूर होऊन आरोग्य सुधारते.
खजूर खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता, पित्त शांत होते. आकाराने लहान असलेले फळ जगभरातील लोकांसाठी वरदान ठरते. त्यामुळे उपवास सोडताना कायमच सगळ्यात आधी खजूर खाल्ले जाते.
इफ्तारमध्ये खजूर खाऊन उपवास सोडणे ही केवळ परंपरा नसून यामागे अनेक कारण सुद्धा आहेत. उपवास केल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा वाढतो, ज्याच्या परिणामांमुळे डोकेदुखी किंवा ऍसिडिटीची पातळी वाढते. पित्ताची पातळी कमी करण्यासाठी खजूर खाल्ले जाते.
खजूरमध्ये असलेले घटक रक्तात मिक्स झाल्यानंतर ३० मिनिटांमध्ये शरीराला ऊर्जा देतात. याशिवाय मेंदूच्या नसा सुद्धा फ्रेश होतात. शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी दोन किंवा तीन खजूर खावे.
खजूरमध्ये असलेले ओलावा त्वचेवरील कोरडेपणा कमी करतो. याशिवाय यामध्ये लोह, कॅल्शियम, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात.