वर्षानुवर्षे आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध मध खराब का होत नाही? जाणून घ्या यामागील आश्चर्यकारक कारणे
मधामध्ये पाण्याचे प्रमाण केवळ १७-१८ टक्के एवढेच असते. नैसर्गिकरित्या मध हा खूप 'हायग्रोस्कोपिक' असतो, ज्यामुळे मधातील आर्द्रता शोषून घेतली जाते. त्यामुळे मधात पाणी जास्त वेळ टिकून राहत नाही.
मधाचा पीएच साधारणपणे ३.२ ते ४.५ च्या दरम्यान असतो.पण तरीसुद्धा मधात जास्त वेळ कोणतेही सूक्ष्मजीव किंवा बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाहीत.
मधमाशा फुलांमधून रस गोळा करताना त्यांच्या पोटातील ग्लुकोज ऑक्सिडेज नावाचे एन्झाइम फुलांच्या रसात मिक्स करतात. त्यानंतर त्याचे रूपांतर मधात होते. या एन्झाइममुळे 'हायड्रोजन पेरोक्साईड' तयार होते आणि मध जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहते.
चांगल्या मधात साखरेसारखे खडे तयार होतात. हा मधाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. घट्ट झालेले मध पुन्हा एकदा पातळ करण्यासाठी कोमट पाण्यात मधाची बरणी ठेवावी.
मधाची बरणी कायमच घट्ट बंद करावी. कारण यात ओलावा तयार झाल्यास मध खराब होण्याची शक्यता असते.