ध्वजारोहणानंतर दीपके यांनी गावातील शाळेला भेट देत पाहणी केली. या पाहणीदरम्यान वर्गांच्या फुटलेल्या खिडक्या आणि अस्वच्छ शौचालये आणि त्यांची दुरावस्था दिसून आली. फुटलेल्या खिडक्या झाकण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोंचे बॅनर लावण्यात आल्याचे दिसल्याने अभिजीत दिपकेंनी अवस्थेबाबत दीपके यांनी नाराजी व्यक्त केली.
‘ग्रामीण भागातील शाळा ठीक केल्याशिवाय विकास शक्य नाही’ अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले की, “खिडक्या फुटक्या आहेत, बाथरूम घाण आहे. ग्रामीण भागातील शाळा ठीक केल्या नाहीत, तर देशाचा विकास होणे शक्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर शाळेतील या समस्या दूर कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. अभिजीत दिपके यांच्या या प्रतिक्रीयेनंतर पुढी आठ दिवसांत शाळेतील दुरुस्तीची कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही सरपंचांनी दिल्याचे दीपके यांना दिली.
अभिजीत दिपके म्हणाले, राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था खराब असून, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या शाळांकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा कमी होत आहे. त्यात भर म्हणून आता सरकारने शिक्षकांना एसआयआरच्या कामाला लावले आहे. सरकारने शिक्षकांना एसआयआरच्या कामाला लावण्याऐवजी इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि शिक्षकांना केवळ शिकवण्याचे काम द्यावे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
सरकारी शाळा बंद पडण्यामागे सरकारचे धोरणही कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासगी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच आज सरकारी शाळा बंद पडत असल्याचे त्यांनी नमुद केले. देशातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजही पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित करत दीपके यांनी सरकारवर टीका केली.
“नवीन पीएम हाऊस आणि संसद भवन बांधण्यापेक्षा आधी शाळा बांधा. अशा इमारतींमुळे देशाची प्रगती होत नाही. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने मतदान करतात आणि त्यांच्या मुलांचे भविष्य सरकारच्या धोरणांवर अवलंबून आहे, असेही त्यांनी नमूद केले.
देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असल्याचा दावाही त्यांनी केला. शिक्षणव्यवस्थेसह देशातील बेरोजगारी आणि जातीय राजकारणामुळे देशातील वातावरण दूषित झाले आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ या भानगडीत पडू नका. शिक्षित होणे म्हणजे चांगला माणूस बनणे होय,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, देशाची प्रगती होण्यासाठी शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच,
‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सरकारी शाळांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा CJPचा प्रयत्न असल्याचे दीपके यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.
ध्वजारोहणानंतर दीपके यांनी गावातील शाळेला भेट देत पाहणी केली. या पाहणीदरम्यान वर्गांच्या फुटलेल्या खिडक्या आणि अस्वच्छ शौचालये आणि त्यांची दुरावस्था दिसून आली. फुटलेल्या खिडक्या झाकण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोंचे बॅनर लावण्यात आल्याचे दिसल्याने अभिजीत दिपकेंनी अवस्थेबाबत दीपके यांनी नाराजी व्यक्त केली.
‘ग्रामीण भागातील शाळा ठीक केल्याशिवाय विकास शक्य नाही’ अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले की, “खिडक्या फुटक्या आहेत, बाथरूम घाण आहे. ग्रामीण भागातील शाळा ठीक केल्या नाहीत, तर देशाचा विकास होणे शक्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर शाळेतील या समस्या दूर कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. अभिजीत दिपके यांच्या या प्रतिक्रीयेनंतर पुढी आठ दिवसांत शाळेतील दुरुस्तीची कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही सरपंचांनी दिल्याचे दीपके यांना दिली.
अभिजीत दिपके म्हणाले, राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था खराब असून, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या शाळांकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा कमी होत आहे. त्यात भर म्हणून आता सरकारने शिक्षकांना एसआयआरच्या कामाला लावले आहे. सरकारने शिक्षकांना एसआयआरच्या कामाला लावण्याऐवजी इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि शिक्षकांना केवळ शिकवण्याचे काम द्यावे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
सरकारी शाळा बंद पडण्यामागे सरकारचे धोरणही कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासगी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच आज सरकारी शाळा बंद पडत असल्याचे त्यांनी नमुद केले. देशातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजही पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित करत दीपके यांनी सरकारवर टीका केली.
“नवीन पीएम हाऊस आणि संसद भवन बांधण्यापेक्षा आधी शाळा बांधा. अशा इमारतींमुळे देशाची प्रगती होत नाही. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने मतदान करतात आणि त्यांच्या मुलांचे भविष्य सरकारच्या धोरणांवर अवलंबून आहे, असेही त्यांनी नमूद केले.
देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असल्याचा दावाही त्यांनी केला. शिक्षणव्यवस्थेसह देशातील बेरोजगारी आणि जातीय राजकारणामुळे देशातील वातावरण दूषित झाले आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ या भानगडीत पडू नका. शिक्षित होणे म्हणजे चांगला माणूस बनणे होय,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, देशाची प्रगती होण्यासाठी शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच,
‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सरकारी शाळांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा CJPचा प्रयत्न असल्याचे दीपके यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.