
दिल्लीतील आंदोलनावर सरकारची पहिली मोठी प्रतिक्रिया;
नीट पेपरफुटीच्या कथित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर गेल्या ३० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने आता अधिक आक्रमक स्वरूप धारण केले असून आज कॉकरोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती.
याआधीच पोलिसांनी जंतरमंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवत बॅरिकेडिंग केले. आंदोलनकर्त्यांना ठरावीक क्षेत्रात रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही काही समर्थक संसद भवन परिसराच्या दिशेने पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा पार पडली असून त्यांच्या मागण्या सरकारकडे अधिकृतपणे सादर करण्यात आल्या आहेत. नड्डा म्हणाले की, सकाळी सुमारे ११.५० वाजल्यापासून चर्चा सुरू होती. शिष्टमंडळाशी शांततापूर्ण वातावरणात संवाद झाला असून दुपारी निवेदनही स्वीकारण्यात आले. जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले.
आंदोलनकर्त्यांनी सरकारसमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये:
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी चर्चेच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला की, चर्चेसाठी बोलावण्यात आल्यानंतर त्यांना जवळपास दोन तास प्रतीक्षा करावी लागली आणि त्यानंतर केवळ दहा मिनिटांची भेट देण्यात आली.
सौरभ दास यांनी सर्व खासदारांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भूमिका घेण्याचे आवाहन केले. तसेच आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दिल्लीतील हे आंदोलन आणि सरकार-आंदोलकांमधील संवाद यामुळे पुढील काही दिवसांत राष्ट्रीय राजकारणात या मुद्द्यावर मोठी चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.