
Keshav Upadhye slams Uddhav Thackeray over attendance in Vidahan Parishad, Uddhav Thackeray Vidhan parishad Attendance,
सोमवारी (१८ मे) विधान भवनातील सदस्यांच्या उपस्थितीची माहिती समोर आली. यात उद्धव ठाकरे यांची गेल्या चार वर्षातील सभागृहातील उपस्थितीही जाहीर करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षात त्यांनी केवळ ३१.५८ टक्के इतकीच उपस्थिती नोंदवली असल्यामुळे आता त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत, “केवळ “माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, पक्षाचे चिन्ह चोरले” अशा भावनिक वल्गना करून सहानुभूती मिळत नसते, त्यासाठी सातत्याने मेहनत, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो,” अश्या तिखट शब्दांत टीका केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सभागृहातील ‘अटेंडन्स कार्ड’ सादर झाले असून उपस्थितीची आकडेवारी थक्क करणारी आहे.. असे प्रतिनिधी जनता कसे स्वीकारणार ? केवळ “माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, पक्षाचे चिन्ह चोरले” अशा भावनिक वल्गना करून सहानुभूती मिळत नसते. वडिलोपार्जित पक्ष मिळणं… — Keshav Upadhye (@keshavupadhye) May 18, 2026
आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत केशव उपाध्ये म्हणाले, “माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सभागृहातील ‘अटेंडन्स कार्ड’ सादर झाले असून उपस्थितीची आकडेवारी थक्क करणारी आहे.. असे प्रतिनिधी जनता कसे स्वीकारणार ? केवळ “माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, पक्षाचे चिन्ह चोरले” अशा भावनिक वल्गना करून सहानुभूती मिळत नसते. वडिलोपार्जित पक्ष मिळणं वेगळं आणि तो सक्षमपणे चालवणं वेगळं! त्यासाठी सातत्याने मेहनत, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आता हे बघा, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केवढी मोठी संधी आली होती..मुख्यमंत्रीपद चालून आले..बिनविरोध विधान परिषद मिळाली..पण त्या संधीचं रूपांतर जनाधारात करण्याऐवजी उबाठासैनिकांच्या हाती आले काय तर भ्रमाचा भोपळा? ‘मीच राजा आणि सगळ्यांनी म्हणा मला महाराजा’ असे फार दिवस चालत नसते, साहेब.. हातात आलेल्या संधीचे सोने करण्याऐवजी तोंडाच्या वाफा दवडून आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर गरळ ओकून चालत नसते..जनतेला विकास पाहिजे असतो आणि तो देणारे ‘विकास पुरुष’ महाराष्ट्रातील जनतेने ओळखले आहेत, त्यांना तळागाळापासून सर्वत्र कौल मिळत आहे !”
“आपली भूमिका, आपले कर्तृत्व, आपल्या दृष्टिकोन दाखवण्यासाठी विधिमंडळ असते. पण, त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती लावली तर.. चार भिंतीआड बसणाऱ्यांना जनता नेहमीच झिडकारते, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.. आणि त्याचे रेकॉर्डही आता उपलब्ध झाले आहे,” अश्या शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
विधान परिषदेत २०२० मध्ये सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकूण १३३ बैठकांपैकी फक्त ४२ बैठकांना हजेरी लावली आहे. म्हणजेच टक्केवारी काढल्यास त्यांची एकूण टक्केवारी फक्त ३१.५८ इतकीच निघते. २०१९ साली मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली होती. पण कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे काळातील उपस्थितीची नोंद उपलब्ध नाही. त्यानंतर, २०२२ साली आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पावसाळी अधिवेशनात फक्त एकदाच उपस्थिती दर्शवली. त्यानंतर देखील २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १६ पैकी फक्त ४ बैठकींना ते उपस्थित असल्याची नोंद आहे.
ठाकरे गटाचा खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का?