
Lakshman Hake slams Maharashtra Government, Maharashtra Government decision of Maratha students will get OBC Students benefits
लक्ष्मण हाके यांनी आज (शनिवार, ६ जून) पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबाबत भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “काल राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत. त्यावर बरीच चर्चा सुरु आहे. ज्या योजना ओबीसींसाठी, त्याच योजना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी देण्याचा निर्णय झाला आहे. ज्या योजना ओबीसी समाजाला दिल्या आहेत. त्या अभ्यासपूर्ण आहेत. याच योजना मराठा समाजासाठी जाहीर करत आहेत. त्यामागचं लॉजिक आम्हाला कळलं नाही. मराठा समाज त्या नियमांत बसतो का? हि तर शासनाची वैचारिक दिवाळखोरी आहे.”
ते पुढे म्हणाले, “सर्व निकष बाजूला ठेवले आहेत का? अनेक महामंडळांना अपुरा निधी असताना, मराठा समाजाला एवढा निधी का दिला जात आहे? ओबीसी लोकांना सरकारने आतापर्यंत काय दिले आहे. त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक प्रश्न सरकारवर उपस्थित होत आहेत. मागासवर्गीय लोकांना माणुसकी म्हणून पुढे येण्यासाठी सरकार काही योजना देणार आहे का? सरकार मूलभूत तत्वांना हरताळ फासत आहेत. कालचा निर्णय असंवैधानिक आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या योजना दिल्या, मग राज्यात आता राहिले कोण? मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना काही वेगळं मिळत असेल तर आमचा विरोध नाही मात्र हे देताना काय निकष लावले आहेत? कुठल्या तत्वावर तुम्ही हे दिले? कुठल्या समितीची शिफारस यासाठी होती? हे सरकार झुंडशाहीला बळी पडले आहे, हे सरकार मनोज जरांगे समोर लाचार झाले आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली.
‘शरद पवार गटाने दोनवेळा दगा दिला,’ पुणे विधानपरिषद निवडणूक माघारीवरून वसंत मोरे भडकले