Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत होतील’; ‘या’ बड्या नेत्याने केले विधान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशिवाय स्थानिक विकास होऊ शकत नाही. केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र काम केले तर विकासाला गती मिळेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 04, 2025 | 08:55 AM
महाविकास आघाडी एकसंघपणे लढणार; इचलकरंजी महानगरपालिकेत भक्कम पर्याय देणार

महाविकास आघाडी एकसंघपणे लढणार; इचलकरंजी महानगरपालिकेत भक्कम पर्याय देणार

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या लवकर व्हाव्यात असे लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरिकांचीही इच्छा आहे. असे असताना राज्याचे महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यापर्यंत घेतल्या पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात घेतल्या पाहिजेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आवश्यक ते संसाधन राज्य सरकारला पुरवायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करत या लांबलेल्या निवडणुकांमुळे अस्वस्थता असल्याचेही मंत्री बावनकुळे यांनी मान्य केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सार लक्षात घेता ऑक्टोबरपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. जर निवडणुका झाल्या तर महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 13000 नवीन नेते तयार होतील.

याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशिवाय स्थानिक विकास होऊ शकत नाही. केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र काम केले तर विकासाला गती मिळेल. भाजपचे संघटनपर्व संपले. आतापर्यंत 1.5 कोटी सदस्य आहेत. भाजप निवडणुकीसाठी सज्ज आहे. उद्या निवडणुका झाल्या तरी महायुती तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

निवडणुका चार महिन्यांत घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगर पंचायतींची निवडणूक प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशाप्रकारे, कोरोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत. दरम्यान, आता निवडणूक आयोगाने देखील याबाबत महत्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता निवडणुक आयोगाने राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Local body elections will be held by october says chandrashekhar bawankule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Local Body Elections
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण
1

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण

Raigad News : “ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार हा एकच मार्ग” – खासदार सुनिल तटकरे
2

Raigad News : “ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार हा एकच मार्ग” – खासदार सुनिल तटकरे

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका
3

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका

काँग्रेस नेते वडेट्टीवारांचे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केलं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण
4

काँग्रेस नेते वडेट्टीवारांचे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केलं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.