Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मतपेट्यांमध्ये घालमेल करण्याची संधी सरकारला मिळू शकते’; माजी मुख्यमंत्र्यांचा घणाघात

नगरपालिका निवडणुकांच्या मतदानानंतर कराडमध्ये माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले, या विस्कळीत प्रक्रियेने निवडणुकांवरील लोकांचा विश्वास ढासळत आहे. सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 03, 2025 | 11:08 AM
मतपेट्यांमध्ये घालमेल करण्याची संधी सरकारला मिळू शकते

मतपेट्यांमध्ये घालमेल करण्याची संधी सरकारला मिळू शकते

Follow Us
Close
Follow Us:

कराड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरू असलेला गोंधळ हा निवडणूक आयोगाच्या अक्षमतेचा जिवंत पुरावा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन निकाल ३ तारखेऐवजी आता २१ तारखेला जाहीर होणार आहे. म्हणजे तब्बल १६-१७ दिवस मतपेट्या गोडाऊनमध्ये पडून राहणार आहेत या काळात घालमेल करण्याची संधी सरकारला मिळू शकते, असा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केला.

नगरपालिका निवडणुकांच्या मतदानानंतर कराडमध्ये माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले, या विस्कळीत प्रक्रियेने निवडणुकांवरील लोकांचा विश्वास ढासळत आहे. सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. कोर्टात प्रकरण गेल्यावर सरकारच्या वकिलांनी प्रभावीपणे बाजू मांडली असती, तर निकाल पुढे गेला नसता. परंतु त्या पातळीवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आणि आता निवडणूक आयोगावर दोष ठेवण्यात अर्थ नाही.

ते म्हणाले, ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे भाजप सरकारने केलेले दुर्लक्ष म्हणजे लोकशाही संपवण्याचा प्रयत्नच आहे. गेल्या दहा वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच नाहीत. पाच वर्षे प्रशासन नोकरशाहीकडे राहिले. निवडून आलेल्या लोकप्रतिनिध्यांना कुठलाही अधिकार दिला गेला नाही.

हेदेखील वाचा : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेकडून मतदारांना पैसे वाटप; वैभव नाईकांनी व्हिडिओ जारी करत साधला निशाणा

73 आणि 74 व्या घटनादुरुस्तीने नागरिकांना वेळेवर निवडणूक होण्याचा घटनात्मक अधिकार दिला, पण तो अधिकार भाजप सरकारने आपल्या राजकीय स्वार्थासाठी पायदळी तुडवला, असा आरोप चव्हाण यांनी केला. जोपर्यंत जनता जागी होत नाही, तोपर्यंत हे सुरूच राहणार. लोकशाही कमी होत जाऊन हुकूमशाही हलक्या पावलांनी पुढे सरकताना दिसत आहे. याचा मी तीव्र निषेध करतो, असे त्यांनी नमूद केले.

…तेव्हा सरकारी वकील झोपले होते काय?

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना ते म्हणाले, आयोगाने चुकीचे वागले, हे मान्य. पण कोर्टात जेव्हा निकाल पुढे ढकलण्याचा मुद्दा आला, तेव्हा सरकारी वकील झोपले होते काय? सरकारला तात्काळ निकाल हवा होता, हे ठामपणे सांगायला हवे होते. पण सरकार बाजू मांडण्यात अयशस्वी ठरले आणि संपूर्ण ठपका आयोगावर ठेवत आहेत, ही शंभर टक्के चूक सरकारचीच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

हेदेखील वाचा : बिहारनंतर पश्चिम बंगालसह ‘या’ राज्यांत होणार निवडणुका; अमित शहांकडे येणार मोठी जबाबदारी

Web Title: Maharashtra government may get an opportunity to tamper with ballot boxes says former cm prithviraj chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • Local Body Elections
  • Maharashtra Politics
  • Prithviraj Chavan

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “… आज बाळासाहेब नाहीयेत ते बरंय”; मनसे अध्यक्ष राज ठाकरे कडाडले
1

Maharashtra Politics: “… आज बाळासाहेब नाहीयेत ते बरंय”; मनसे अध्यक्ष राज ठाकरे कडाडले

Maharashtra Politics : मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात महायुतीचाच महापौर; एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका
2

Maharashtra Politics : मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात महायुतीचाच महापौर; एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा मोठे बदल; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान
3

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा मोठे बदल; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

Maharashtra Politics : मनसेच्या ‘त्या’ निर्णयाने राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी
4

Maharashtra Politics : मनसेच्या ‘त्या’ निर्णयाने राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.