
ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; निवडणूक आयोगावर गंभीर आरोप (Photo Credit- X)
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, निवडणूक आयोगाचा दृष्टिकोन पूर्णपणे भाजपधार्जिणा होता. “देशात लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे. मी रस्त्यावर होते आणि यापुढेही जनतेसाठी रस्त्यावरच उतरून संघर्ष करत राहीन. राजीनामा देण्यासाठी मी राजभवनात का जावे? मला जर शपथ घ्यायची असती तर मी गेले असते, पण त्यांनी सर्व यंत्रणेवर कब्जा केला आहे,” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. निवडणुकीच्या काळात झालेल्या प्रशासकीय बदलांवर त्यांनी बोट ठेवले. “दोन टप्प्यातील मतदानानंतर आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरुवात झाली आणि निष्पक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांनी स्वतःच्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आणि EVM मशीनबाबतही संशयास्पद हालचाली झाल्या,” असा दावा बॅनर्जी यांनी केला.
#WATCH | Kolkata: Outgoing West Bengal CM Mamata Banerjee says, “Sonia ji, Rahul Gandhi, Arvind Kejriwal, Uddhav Thackeray, Akhilesh Yadav, Tejashwi Yadav, Hemant Soren rang me up. All the allies of INDIA Alliance told me that they are totally and absolutely with me. I think our… pic.twitter.com/W8ZRWMP1d2 — ANI (@ANI) May 5, 2026
या कठीण प्रसंगात संपूर्ण ‘इंडिया’ आघाडी त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे ममता बॅनर्जींनी सांगितले. “मी माझ्या राजकीय कारकिर्दीत असा जुलूम कधीच पाहिला नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन यांसारख्या नेत्यांनी माझ्याशी संवाद साधून पाठिंबा दर्शवला आहे. अखिलेश यादव देखील भेटीसाठी येत आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
Who is Next CM of West Bengal; भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी ५ दिग्गज शर्यतीत !
मतमोजणीच्या दिवशी झालेल्या प्रकारावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, “मोजणी केंद्रांचे हायजॅकिंग करण्यात आले असून कालचा दिवस लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळा इतिहास’ म्हणून ओळखला जाईल. मला स्वतःला एका महिलेला मतदान केंद्रावरून धक्के मारून बाहेर काढण्यात आले, तर सर्वसामान्यांची काय अवस्था झाली असेल? त्यांनी आमची कार्यालये ताब्यात घेतली असून कार्यकर्त्यांवर अत्याचार सुरू केले आहेत”.
या अन्यायाविरुद्ध कायदेशीर आणि राजकीय लढा देण्यासाठी तृणमूल काँग्रेसने १० सदस्यीय ‘फॅक्ट फाइंडिंग कमिटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती विविध भागांचा दौरा करून सत्य परिस्थिती समोर आणेल. “जर त्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक जिंकली असती, तर मी काहीच बोलले नसते. पण हा विजय जबरदस्तीने मिळवलेला आहे. आम्ही पुन्हा जोमाने फिनिक्स भरारी घेऊ,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारला केवळ एकाच पक्षाची सत्ता देशात हवी असून, यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या लोकशाहीबद्दल चुकीचा संदेश जात असल्याची टीकाही त्यांनी शेवटी केली.
West Bengal Assembly Election Results 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाची इनसाईड स्टोरी