Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“छुपा राजकीय अजेंडा चालवून गुंड राजकीय मित्र वाचवला…”; आरोपपत्रावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये वाल्मिक कराडचे नाव आले असले तरी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेण्यात आलेले नाही यावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 02, 2025 | 04:34 PM
manoj jarange patil claim OBCs attempt to create riots in Maratha reservation movement

manoj jarange patil claim OBCs attempt to create riots in Maratha reservation movement

Follow Us
Close
Follow Us:

जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण तापले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळे हा फरार असून त्याला अटक करण्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचे सांगितले गेले आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये संबंध असल्याचा दावा करत राजीनामा मागितला जात आहे. या प्रकरणावर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड हत्या प्रकरणावरुन महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराडचे नाव आरोपी म्हणून घेण्यात आले असले तरी देखील धनंजय मुंडे यांचे घेतलेले नाही. यावरुन जरांगे पाटील यांनी रोष व्यक्त केला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खोटा अजेंठा राबवल्यामुळे धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी केलं नाही, यात मुंडेना शिक्षा झाली असती मात्र राजकिय मित्राला वाचवलं. सोईकररित्या हे प्रकरण संपविले. राजकीय लोकांची राजकीय मैत्री जागी झाली आणि ही मैत्री जागी झाली की सर्वसामान्य जनतेला अन्याय सहन करावा लागतो. बडा नेता कोण हे न्यायालयाच्या पटलावर हा विषय आला की बड्या नेत्याला फोन केला मात्र सरकारने नेता वाचविला. या नेत्याचा हात शंभर टक्के आहे. नेत्याने गुंड मित्र वाचवला,” अशी टीका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये लवकर आरोपपत्र दाखल होणार नाही असा आरोप देशमुख कुटुंबियांकडून केला जात होता. यामध्ये उशीर केला जाईल तसेच अनेकांना वाचवले जाईल पुरवणी आरोप पत्रात सहआरोपी होतीलच अशी शंका असल्याने या प्रकरणात धनंजय मुंडेना क्लीनचिट देण्यात आली, असा अंदाज धनंजय देशमुख यांनी केला होता. मात्र उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर लगेगच आरोपपत्र दाखल करण्यात आले. यावरुन पुढे जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “संतोष देशमुख प्रकरणाचे चार्जशीट अजून दोन महिने दाखल होणार नाही अशी अपेक्षा होती. त्या चार्जशीटमध्ये फोडाफोडी होणार नाही यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या दुसर्‍या दिवशीच चार्जशीट दाखल करण्यात आली. धनंजय मुंडे सहआरोपी होणार होते. मात्र मुंडे या प्रकरणात वाचले. त्यांना वाचवण्यात आले,” असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “छुपा राजकीय अजेंडा चालवून गुंड आणि राजकीय मित्र वाचवला. मात्र तुमच्या पक्षाचा प्रमाणिक सरपंचाला न्याय देऊ शकला नाही. सरकारच्या प्रतिनिधींनी पद्धतशीरपणाने त्यांचे राजकीय गुंड मित्रासह टोळीही वाचवली. मात्र पुढील तपासात काही सहआरोपी होतात पाहू. मात्र न झाल्यास पुढील काळात त्रास देणार्‍या टोळीविरोधात आमची मोहिम असेल,” असा आक्रमक पवित्रा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.

Web Title: Manoj jarange patil is aggressive over not mentioning dhananjay munde in the chargesheet in santosh deshmukh murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 04:34 PM

Topics:  

  • Dhnanjay Munde
  • Manoj Jarange
  • Santosh Deshmukh Murder

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
2

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
3

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा
4

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.