Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद

कृषिमंत्रिपद हे ज्या राजकीय नेत्याकडे जाते, त्याच्यावर वेगवेगळे आरोप होतात, असाच अनुभव महाराष्ट्राने आजवर घेतला. राज्याच्या कृषी खात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 03, 2025 | 01:42 PM
महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; 'या' पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; 'या' पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात महाराष्ट्राचे कृषिमंत्रिपद म्हणजे काटेरी मुकुट ठरत आहे. आतापर्यंत राज्यात पाच बड्या नेत्यांनी कृषिमंत्रीपद सांभाळले ते सारे नेते या खात्यामुळे गोत्यात आल्याचे दिसून येत आहे. माणिकराव कोकाटे यांच्या खाते बदलाने यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वी धनंजय मुंडे असो एकनाथ खडसे असो वा इतर नेते यांच्या पदाच्या कार्यकाळात अनेक घडामोडी घडल्या आहेत.

कृषिमंत्रिपद हे ज्या राजकीय नेत्याकडे जाते, त्याच्यावर वेगवेगळे आरोप होतात, असाच अनुभव महाराष्ट्राने आजवर घेतला. राज्याच्या कृषी खात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, गेल्या दीड दशकात याच कृषीखात्याच्या मंत्र्यांमागे वादाचं ग्रहण लागल्याचे दिसून येते. ज्याच्याकडे कृषी खात्याचा पदभार जातो, तो मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकतो, हा इतिहास आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषिखात्याचा पदभार होता. आधी सततची वादग्रस्त वक्तव्यं आणि नुकताच रमी खेळतानाचा कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कोकाटेंना कृषिमंत्रीपद गमवावं लागले.

हेदेखील वाचा : महायुतीचे नेते काही सुधारेना! आपल्या बापाचा पैसा आहे का? रोहित पवारांच्या रडावर आता शिंदेंचा नवा नेता, व्हिडिओ व्हायरल

एखाद्या वादामुळे कृषीखाते सोडावे लागणारे माणिकराव कोकाटे एकटे नाहीत. तर यापूर्वी अनेक नेत्यांना कृषिमंत्रिपदावर असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. 2014 मध्ये एकनाथ खडसे कृषिमंत्री झाले. खडसेंवर वेगवेगळे आरोप झाल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर एकनाथ खडसेंचे राजकीय करिअरच उतरणीला लागले.

2022 मध्ये अब्दुल सत्तार कृषीमंत्री

2019 मध्ये दादा भुसे कृषिमंत्री झाले. पण नंतर 2022 मध्ये शिंदे सरकारमध्ये त्यांना दुय्यम खाते मिळाले. 2022 मध्ये अब्दुल सत्तार कृषिमंत्री झाले. अब्दुल सत्तारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अब्दुल सत्तारांकडील कृषीखाते काढून घेतले. 2025 च्या सरकारमध्ये सत्तारांना डच्चू मिळाला. धनंजय मुंडे हे 2023 मध्ये कृषीमंत्री झाले होते. मात्र, नंतर तेही अडचणीत आले होते.

अनेक वादग्रस्त विधानांमुळे नेते अडचणीत

महायुतीमधील अनेक नेते वादग्रस्त विधाने करत आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. धनंजय मुंडे हे बीडमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे अडचणीत आले. तर माणिकराव कोकाटे हे थेट शासनाला भिकारी म्हणाले होते. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला तर माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले.

Web Title: Many leaders who have served as agriculture ministers have come into trouble so far

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • dhananjay munde
  • Maharashtra Politics
  • Manikrao Kokate

संबंधित बातम्या

Ratnagiri : मंत्री उदय सामंत यांचा हल्लाबोल; “महायुती भगवा फडकवणारच”
1

Ratnagiri : मंत्री उदय सामंत यांचा हल्लाबोल; “महायुती भगवा फडकवणारच”

Maharashtra Politics: “…हे विरोधकांचे कामच असते”; अजित पवारांची ठाकरेंवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “…हे विरोधकांचे कामच असते”; अजित पवारांची ठाकरेंवर जोरदार टीका

महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा होणार उपलब्ध, क्रीडा युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली माहिती
3

महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा होणार उपलब्ध, क्रीडा युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली माहिती

‘…त्यांचा ज्योतिषच बोगस’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4

‘…त्यांचा ज्योतिषच बोगस’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.