Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : 2029 मध्ये महायुतीचं सरकार जाणार…! सरकारच्या नाकी नऊ आणणाऱ्या मराठा नेत्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Maharashtra Politics : राज्यामध्ये महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आले आहे. मात्र हे सरकार कोसळणार असल्याचा दावा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 08, 2025 | 06:26 PM
Maratha Manoj Jarange Patil claimed Mahayuti government will collapse in 2029 political news

Maratha Manoj Jarange Patil claimed Mahayuti government will collapse in 2029 political news

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यातील महायुतीचे सरकार कोसळणार असल्याचा दावा
  • मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
  • गर्वाचे सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य
Maharashtra Politics : मुंबई : मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जोरदार राजकीय वाद निर्माण झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections) प्रचारावेळी हा वाद चव्हाट्यावर आला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देखील नाराजीनाट्य असल्याचे दिसून आले आहे. मात्र आता हिवाळी अधिवेशनापूर्वी (Winter Session) महायुतीमध्ये मनोमिलन झाल्याचे बोलले जात आहे. मात्र 2029 मध्ये महायुतीचे सरकार जाणार असल्याचा दावा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, ‘घातपाताचा कट प्रकरणात पोलीसांना आरोपींनी जबाब दिला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावलं जात नाही. अटक केली जात नाही. अजित पवार आणि फडणवीस यांच्यावरती शंका उपस्थित करणारा प्रश्न आहे. 100% धनंजय मुंडे त्यांच्या पायाखाली लोळला आहे. जरांगे पाटील यांच्या चौकशी पासून टाळा अशी विनंती केली असेल. रश्मी शुक्ला यांना माझी विनंती आहे, जो घातपात करत असेल त्यांना वाचवू नका, फडणवीस साहेब तुम्ही या पापामध्ये सहभागी होऊ नका. मराठ्यांची लाट फडणवीस आणि अजित पवार तुम्ही घेऊ नका.’असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

हे देखील वाचा : भास्कर जाधव ठरले ‘ऑपरेशन टायगर’चे शिकार? विरोधी पक्षनेते न मिळताच घेतली शिंदेंच्या नेत्याची हॉटेलमध्ये भेट

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “अडीच कोटीची सुपारी घेतली त्या पोरांच्या कुटुंबांना मी दोष देणार नाही. समाजाला सांगितले आहे की आरोपीच्या कुटुंबाना त्रास द्यायचा नाही. करणाऱ्या पेक्षा करून घेणारा महत्त्वाचा आहे तो म्हणजे धन्या आहे. अजित दादांनी धन्या सारखी लोक ठेवू नयेत, ते तुमच्यासाठी आणि मराठा समाजासाठी घातक ठरतील. तुमच्या पक्षाचा विनाकारण बळी जाऊ नये, तुमच्या पक्षाची उतरती कळा त्यांच्यामुळे लागू नये. तुमच्या पक्षातील लोक चांगले आहेत, मात्र याच्या एकट्यामुळे तुमचा नाश तुम्ही करून घेऊ नका असं माझं अजित दादांना सांगणं आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे.” असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे.

हे देखील वाचा : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा प्रयत्न? मुंडेंनी 2 कोटींची सुपारी दिली असल्याचा केला दावा

मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीच्या सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “मराठे हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात गेले तर 2029 हातातून सत्ता जाऊ शकते. काँग्रेस पक्ष समुद्रासारखा होता त्याची देखील सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली त्यामुळे फडवणीस यांनी गर्वात राहायचं नाही. ते असं जर करत राहिले तर सरकारला उतरती कळा लागणार. मराठे सोपे नाहीत, जीवाला जीव देणारे मराठे आहेत. धनंजय यांच्या पापात अजित पवार आणि फडणवीस सहभागी झाल्यामुळे यांच्या पक्षाचा सत्तेचा बळी जाऊ शकतो.” अशी राजकीय भविष्यवाणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली.

Web Title: Maratha manoj jarange patil claimed mahayuti government will collapse in 2029 political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mahayuti Government
  • Manoj Jarange

संबंधित बातम्या

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा प्रयत्न? मुंडेंनी 2 कोटींची सुपारी दिली असल्याचा केला दावा
1

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा प्रयत्न? मुंडेंनी 2 कोटींची सुपारी दिली असल्याचा केला दावा

Farmers News: “३० जूनपूर्वी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी: मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही”
2

Farmers News: “३० जूनपूर्वी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी: मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही”

Maharashtra Politics: महायुतीचा मोठा निर्णय: घटक पक्षातील नेत्यांना ‘क्रॉस ओव्हर’वर बंदी
3

Maharashtra Politics: महायुतीचा मोठा निर्णय: घटक पक्षातील नेत्यांना ‘क्रॉस ओव्हर’वर बंदी

राज्यातील सर्व राजकीय पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात; भाजपच्या नेत्याची कबुली, चर्चांना उधाण
4

राज्यातील सर्व राजकीय पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात; भाजपच्या नेत्याची कबुली, चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.