Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाकुंभमेळ्यामध्ये अजूनही 2 हजार नागरिक बेपत्ता? शिवसेनेच्या नेत्यांच्या दाव्याने उडाली एक खळबळ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कुटुंबासह प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होत अमृतस्नान केले. यावरुन खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 15, 2025 | 12:09 PM
MP Sanjay Raut claims that there are 2 thousand missing people in the Maha Kumbh Mela

MP Sanjay Raut claims that there are 2 thousand missing people in the Maha Kumbh Mela

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महायुती सरकारने याचा शासन निर्णय जारी केला आहे. महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (दि.14) राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे आता विरोधकांनी टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. लव्ह जिहादच्या नावाने वातावरण खराब करत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबईमध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते त्यांनी लव्ह जिहादच्या निर्णयावर टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की,”हे सरकार कामाच्या नावावर मत मागू शकत नाही फसवणूक करून, निवडणूक आयोगाला हाताशी धरून विजय मिळवतात. त्यामुळे हे अशा घोषणा करत राहणार. लव्ह जिहाद च्य नावाने वातावरण खराब करीत आहेत. भाजपाकडील काही भाषण माफिया हे ठरवणार का? लव्ह जिहाद झाला म्हणून,” असा घणाघात खासदार राऊत यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी भाजपच्या सत्ताधारी नेत्यांना निधी मिळणार असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत संजय राऊत म्हणाले की, “सरपंच आमच्या पक्षाचा नाही त्यांना विकास निधी देणारा नाही असे विधान एक मंत्री करतो पैसा यांच्या बापाचा आहे का? पैसा जनतेचा आहे हे असे करत आहेत. मंत्री पदाची शपथ घेताना कोणासोबत द्वेषभावना ठेवणार नाही असे बोलतात. पण त्या विरोधात काम करतात हा संविधानाचा अपमान करत आहेत,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

याचबरोबर आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे. आरोप प्रत्यारोपानंतर चार तास बंद दाराआड चर्चा केल्यामुळे टीकेची झोड उठवली आहे. यावर खासदार राऊत म्हणाले की, “आमदार सुरेश धस हे कधी ही पलटी मारतील ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आहे. धस यांनी ही कृती केली असेल तर देव त्यांना क्षमा करणारा नाही. ते पाप आहे. विश्वासघात या पेक्षा पुढले पाऊल आहे. बीड मधील काही नेत्यांनी मला धस यांच्यावर विश्वास ठेवू नका असे सांगितले होते. मला अजून अपेक्षा आहे धस असे काही करणारा नाही,” अशा शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवारासह प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होत अमृतस्नान केले. यावरुन टीका करताना संजय राऊत म्हणाले की, “कुंभमेळ्यात सर्वांनी जायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस गेले त्यात चुकीचे काही नाही. पण किती लोक मेले हे सांगण्यासाठी ते अजून ही तयार नाहीत. महाकुंभमेळ्यामध्ये 2 हजार हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. आमचा आरोप आहे ते मेले आहेत. सरकार हे लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. संसदेत मी प्रश्न विचारला तर माझा माईक बंद केला गेला. एकनाथ शिंदे यांचा पक्ष अमित शहा यांच्या मालकीचा आहे. ते सांगतील ते एकनाथ शिंदे बोलणार. त्यांना सध्या पक्ष चालवायला दिला आहे,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Web Title: Mp sanjay raut claims that there are 2 thousand missing people in the maha kumbh mela 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mahakumbh Mela
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
3

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान
4

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.