
MP Sanjay Raut target PM Narendra Modi over women reservation bill marathi political news
Women Reservation Bill : मुंबई : महिला आरक्षण विधेयक आणि मतदान पुनर्रचना यावरुन महाराष्ट्रसह संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. हे विधेयक संसदेमध्ये नामंजूर झाल्यापासून भाजप आणि मोदी सरकारकडून कडाडून टीका केली जात आहे. मात्र हा कायदा 2023 साली मंजूर झाला असून तो लागू न केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. याच मुद्द्यावरुन आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य करत महिला आरक्षणावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र डागले. खासदार राऊत म्हणाले की, “संवैधानिक पदावर बसलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्याची शपथ घेतलेली असते. त्यांनी जनतेची फसवणूक करू नये. २०२३ मध्येच संसदेने नारी शक्ती अधिनियम मंजूर केला आणि १६ एप्रिल रोजी केंद्र सरकारने त्याची अधिसूचनाही काढली. मग आता पुन्हा महिला आरक्षणाचे डमरू वाजवून कोणाला फसवताय?” असा प्रश्न खासदार राऊतांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : महिला आरक्षण विधेयकावरून हिंगोली तापले! काँग्रेसविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी
पुढे ते म्हणाले की, “२० सप्टेंबर २०२३ ला ट्विट करण्याचे कारण काय. हे बिल मजूर झाले आहे. तेव्हा तुम्ही मोदी यांचे स्वागत केले आहे. तेव्हा ते बिल मजूर झाले त्याच्याबद्दल आमचा निषेध करत आहे. राष्ट्रपती यांच्या सही नंतर तो कार्यदा बनला. आपल्याकडे ३३ टक्के आरक्षण लागू झाले आहे.. त्यांनी स्वतःचा निषेध केला पाहिजे. प्रधानमंत्री यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. तुमच्या महिला आरक्षणासंदर्भात जे मिस कॉल दिले आम्ही दिला ना पाठिंबा, आता का फडफडत आहे तुम्ही.? कोणता मानसिक आजार झाला आहे? एक नंबरचे खोटारडे लोक आहे. जो कायदा मंजूर केला त्याचाच कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहे. यांना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार झाला आहे. पंतप्रधान खोट बोलतात हा आजार आहे,” अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
हे देखील वाचा : मोदींना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही…; विधेयक नामंजूरीवरुन पेटलं राजकारण
पुढे खासदार संजय राऊतांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, “निवडणूक आयोग हे त्यांचे हस्तक आहे. ज्ञानेश याला delimitation आयोगाचे अध्यक्ष करणार होते. त्याच्या घरी भाजपाचा झेंडा फडकत आहे. निवडणूक आयोग लोकशाहीला फाट्यावर मारतो. हा भाजपाचा निवडणूक आयोग झाला आहे. फाट्यावर मारतो,” अशा शब्दांत त्यांनी केली.