
तुळापूर रेव्ह पार्टीप्रकरणावरून रोहिणी खडसेंचा आक्रमक
यावरून आता राज्यभरातुन तीव्र प्रतिक्रिया येत असतानाच पुणे पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अश्यातच आता राजकीय नेत्यांनाही याप्रकरणी सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी यावरून पुणे पोलीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अखेर 11 वर्षांचा पाठलाग संपला! ऊसतोडणी घोटाळ्याचा सूत्रधार आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात
रोहिणी खडसे यांनी आपल्या X अकाऊंटवरून पोस्ट करत यावर भाष्य केले. त्या म्हणाले, “पुण्याजवळच्या तुळापूर येथे एका पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला. पार्टीत तब्बल १५६ लोक सहभागी असताना फक्त ७८ जणांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातही फक्त २९ जणांची टेस्ट करण्यात आली. मला आठवतंय प्रांजल यांच्या प्रकरणात चार – पाच लोक एकत्र जमले होते. त्याला पुणे पोलिसांनी ‘रेव्ह पार्टी’चं नाव दिले होते. आता १५६ लोक सापडली त्याला ‘हाऊस पार्टी’ म्हणत आहेत. प्रांजल यांच्यासह सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते व सर्वांची टेस्ट करण्यात आली होती. मग आता पुणे पोलिस १५६ लोकांपैकी इतर ७८ लोकांवर इतकी का मेहरबान झाली ? फक्त ७८ लोकांवर कारवाई केली मग इतर ७८ लोकांना का सोडण्यात आले ? फक्त २९ लोकांचीच का टेस्ट करण्यात आली? यातून पुणे पोलिसांचा दुटप्पीपणा दिसत आहे.”
पुण्याजवळच्या तुळापूर येथे एका पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला. पार्टीत तब्बल १५६ लोक सहभागी असताना फक्त ७८ जणांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातही फक्त २९ जणांची टेस्ट करण्यात आली. मला आठवतंय प्रांजल यांच्या प्रकरणात चार – पाच लोक एकत्र जमले होते. त्याला पुणे… pic.twitter.com/ifzCD3R2Vc — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 8, 2026
“इतर लोकांना सोडले ते काय आमदार, खासदारांचे मुलं होती का ? की हाय प्रोफाइल लोक होती जी सरकारला मदत करतात ? पोलिस सांगत आहेत की या पार्टीची परवानगी घेण्यात आली होती पण परवानगीचा एक साधा पेपर दाखवला जात नाही. ना अद्याप कारवाईचा एखादा व्हिडिओ समोर आला आहे. प्रांजल यांच्या प्रकरणात व्हिडिओ बाहेर पाठवले जात होते. मीडियाला माहिती पुरवून मीडिया ट्रायल चालवला जात होता. पुणे पोलिसांना कोण तरी चावी देतो तसं पुणे पोलिस वागतं आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“सर्वात पहिले तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या तुळापूरात या पार्टीची परवानगी दिलीच कशी गेली आणि तेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी! याचा खुलासा मा. गृहमंत्र्यांनी करायला हवा,” असेदेखील त्या म्हणाल्या.