Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल सोलापूरकरांचे छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त विधान! रोहित पवार आक्रमक; म्हणाले, “अडगळीत पडलेल्या…”

अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन नवीन वादाला तोंड फुटले असून राजकीय नेत्यांनी त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 04, 2025 | 05:19 PM
Rohit Pawar aggressive on Rahul Solapurkar controversial statement on Chhatrapati Shivaji Maharaj

Rohit Pawar aggressive on Rahul Solapurkar controversial statement on Chhatrapati Shivaji Maharaj

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. इतिहासामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आग्रा सुटकेबाबत त्यांनी वक्तव्य केल्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले असून यावरुन अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत.

आग्रा सुटकेबाबत राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्थ विधान केले. ते म्हणाले की, “शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे काहीच नव्हते” असा दावा त्यांनी केला. “मोहसीन खान किंवा मोईन खान नावाच्या सरदाराकडून महाराजांनी सही-शिक्क्याचे पत्र घेतले होते आणि त्या परवान्याच्या आधारे महाराज आग्र्यातून बाहेर पडले.” तसेच, “स्वामी परमानंद पाच हत्तींसह आग्र्यातून बाहेर पडले होते, याचीही पुरावे उपलब्ध आहेत,” असा उल्लेख राहुल सोलापूरकर यांनी केला. यावरुन नवीन वाद उफाळला असून यावरुन रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. रोहित पवार म्हणाले की, “अडगळीत पडलेल्या एका अभिनेत्याने चर्चेत येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लाघ्य विधान केलं नाही ना? तसं नसेल तर या विधानामागील हेतू आणि सडका मेंदू कुणाचा आहे हे शोधणं गरजेचं आहे. काही वेडपट माणसं छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी चुकीची विधानं कुणाच्या आशीर्वादाने करतात?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आमदार रोहित पवार यांनी पुढे म्हणाले की, “महापुरुष हे केवळ महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी नाही तर सर्वांसाठीच पूजनीय आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी वादग्रस्त विधानं करणं थांबवलं पाहिजे, अन्यथा अशा महाभागांना मराठी माणूस जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही…” असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

अडगळीत पडलेल्या एका अभिनेत्याने चर्चेत येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लाघ्य विधान केलं नाही ना? तसं नसेल तर या विधानामागील हेतू आणि सडका मेंदू कुणाचा आहे हे शोधणं गरजेचं आहे. काही वेडपट माणसं छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा… — Rohit Pawar (@RRPSpeaks) February 4, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरुन आमदार छगन भुजबळ हे देखील आक्रमक झाले आहे. भुजबळ म्हणाले की, “या लोकांना वेड लागलंय का? शिवाजी महाराज मोठ्या सफाईने सुटले. स्वराज्य निर्माण केलं. त्यांची सुटका ही हुशारी आणि रणनीतीचा भाग होता. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सोबत आले असते तर संकट आलं असतं. संभाजी महाराजांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी सोडलं होतं. त्याविषयी मॉसाहेब जिजाऊ यांनी विचारलं होत हा इतिहास आहे,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली.

Web Title: Rohit pawar aggressive on rahul solapurkar controversial statement on chhatrapati shivaji maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Raja Shivaji : स्वराज्य… एका नव्या दृष्टिकोनातून! विद्रोहाची सुरुवात अन् स्वराज्याची ठिणगी; ‘राजा शिवाजी’चा पहिला Teaser Out
1

Raja Shivaji : स्वराज्य… एका नव्या दृष्टिकोनातून! विद्रोहाची सुरुवात अन् स्वराज्याची ठिणगी; ‘राजा शिवाजी’चा पहिला Teaser Out

Ahilyanagar News: 1 वर्षांपूर्वीच कामाला मंजुरी मात्र श्रेयापायी अडकले ‘या’ बसस्थानाकचे काम
2

Ahilyanagar News: 1 वर्षांपूर्वीच कामाला मंजुरी मात्र श्रेयापायी अडकले ‘या’ बसस्थानाकचे काम

NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी
3

NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.