Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आमच्या मनात क्रोध…; पहलगाम हिंदूंवरील हल्ल्याबाबत RSS ची भूमिका काय? मोहन भागवत स्पष्ट बोलले

RSS on Pahalgam Terrorist Attack : पहलगाममध्ये धर्म विचारुन दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये 27 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी भूमिका स्पष्ट केली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 25, 2025 | 10:56 AM
RSS Mohan Bhagwat's reaction on Pahalgam terror attack

RSS Mohan Bhagwat's reaction on Pahalgam terror attack

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद आणि हिंसाचार डोके वर काढत आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. पर्यटकांना लक्ष्य करुन आणि धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यावरुन संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानवधर्म आणि हिंदू धर्म हाच मानवधर्म असल्याचे देखील मोहन भागवत म्हणाले आहेत.

त्यालाच हिंदू धर्म म्हणतात

विलेपार्ल येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये मोहन भागवत हे भाषण करत होते. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ला आणि भारताची भूमिका यावर भाष्य केले. मोहन भागवत म्हणाले की, जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानव धर्म. त्यालाच हिंदू धर्म म्हणतात. आपल्या जवानांनी किंवा आपल्याकडच्या लोकांनी कधी कुणाला धर्म विचारून लोकांना मारलेले नाही. काल कट्टरपंथीयांनी जो उत्पात केला, तसा हिंदू कधीही करणार नाही. पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील. त्यामुळेच आपला देश बलवान पाहिजे”, अशी भूमिका मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या पहलगाम हल्ल्यामध्ये 27 निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत भागवत म्हणाले की, “आपल्या मनात दुःख आहे. सगळ्यांची अंतःकरण जड झाली आहेत. या सर्व कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. पण आमच्या मनात क्रोधही आहे. तो असला पाहिजे. असुरांचं निर्दालन व्हायचं असेल, तर अष्टादश भुजांची शक्ती असलीच पाहिजे. चांगलेपणा दुरुस्त करण्याचे सृष्टीचे जे मार्ग आहेत, त्यात एक मार्ग समजावून देण्याचा असतो. अनुभवातून मनुष्य शिकतो आणि सुधारतो. काही लोक असे असतात जे सुधरतच नाही. जे शरीर, मन त्यांनी धारण केलंय, त्यात परिवर्तन शक्य नसतं,” असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तसेच आक्रमक भूमिका घेतली आहे.

रावण सुधारला पाहिजे

रावणाच्या प्रवृत्तीचे उदाहरण देत त्यांनी भूमिका स्पष्ट करुन सांगितली आहे. भागवत म्हणाले की, “रावण शिवभक्त होता, वेदशास्त्रसंपन्न होता. एक चांगला माणूस बनण्यासाठी जे काही आवश्यक असतं, ते सगळं त्याच्याकडे होतें. पण जे शरीर-मन-बुद्धी त्याची बनली, ती बदलायला तयार नव्हती. दुसरा उपायच नव्हता. रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा देह धारण करत नाही त्याशिवाय तो सुधारणार नाही. त्यामुळे रावण सुधारला पाहिजे. म्हणून रामानं त्याचा वध केला. अशा दुष्ट माणसांचं निर्दालन झालं पाहिजे. क्रोध आहे, अपेक्षाही आहेत. त्या अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतं मला”, असा विश्वास आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्र सरकारबाबत व्यक्त केला आहे.

पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शत्रुता हा आपला स्वभाव नाही

दहशतवादींच्या हिंसक प्रवृत्तीवरुन देखील मोहन भागवत यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, “द्वेष, शत्रुता हा आपला स्वभाव नाही. पण मार खाणं हाही आपला स्वभाव नाही. शक्तीवान माणसाला अहिंसक असायला हवं. जो दुर्बल आहे, त्याला हे व्हायची गरजच नाही. त्याला व्हाव लागतं अहिंसक. म्हणून शक्ती असायला हवी. ती दिसलीही पाहिजे, म्हणजे जगाला कळतं हे शक्तीवान आहेत, यांच्या वाट्याला जाऊ नये. मग जगातल्या दुष्ट लोकांनाही हे समजतं”, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

Web Title: Rss mohan bhagwats reaction on pahalgam terror attack jammu kashmir news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 10:56 AM

Topics:  

  • Jammu Kashmir Terror Attack
  • Pahalgam Terrorist Attack
  • RSS

संबंधित बातम्या

Mohan Bhagwat : संघाला भाजपच्या चष्म्यातून बघू नका…; RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला विश्वगुरु बनण्याचा निर्धार
1

Mohan Bhagwat : संघाला भाजपच्या चष्म्यातून बघू नका…; RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला विश्वगुरु बनण्याचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.