Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Almatti Dam Politics: अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवरून विशाल पाटलांचे गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.  तसेच,कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी साठून फुगवटा निर्माण होईल

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 10, 2025 | 12:50 PM
Almatti Dam Politics: अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवरून विशाल पाटलांचे गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Follow Us
Close
Follow Us:

सांगली: सीमावादानंतर गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सरकारचे आणि शेजारील कर्नाटक सरकारशी आलमड्डी धरणावरून सातत्याने खटके उडत आहेत. अनेकदा यावरून टोकाचा संघर्षही पाहायला मिळाला. धरणाची उंची वाढवण्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून मोठा विरोध केला जात आहे. या  सगळ्यात काँग्रेस आमदार विशाल पाटील यांनी आलमड्डी धरणाच्या मुद्द्यावरू पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. र्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला कृष्णा पाणी लवादानेही मंजुरी दिली आहे. मात्र, यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर टीका करताना हा मुद्दा केवळ राजकारणासाठी उचलला जात असल्याचा आरोप केला आहे.

अलमट्टी उंची वाढीवरून महाराष्ट्र सरकारचा निष्क्रिय प्रतिसाद?

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी संसदेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना, महाराष्ट्रासह कोणत्याही राज्याने या उंची वाढीला विरोध केल्याचा अधिकृत प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्ट केले. या खुलाशामुळे महाराष्ट्र सरकारची भूमिका संशयास्पद ठरली आहे. विशाल पाटील यांनी यावर भाजप सरकारवर टीका करत महाराष्ट्राने अधिकृतरित्या या निर्णयाला विरोध करणे आवश्यक होते, असे मत मांडले.  पणभाजप केवळ राजकीय लाभासाठी हा मुद्दा उचलून धरत आहे, पण प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या हितासाठी कोणतीही ठोस भूमिका घेत नाही.

Pariksha Pe Charcha 2025: तणावविरहित वातावरणात संपूर्ण पेपर कसा सोडवायचा? पंतप्रधान मोदींच्या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांना धोका?

अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढल्यास, धरणाची पाणी पातळी शिरोळ बंधाऱ्यापर्यंत पोहोचू शकते. जलतज्ज्ञांच्या मते, यामुळे सांगली आणि कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे पावसाळ्यात जलमय होण्याची शक्यता वाढू शकते. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.  तसेच,कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी साठून फुगवटा निर्माण होईल, परिणामी अनेक गावे जलमय होण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्राकडून प्रभावी विरोधाची गरज

विशाल पाटील यांनी केंद्र सरकारला तांत्रिक समिती नेमण्याची मागणी संसदेत केली होती. परंतु, महाराष्ट्र सरकारने अद्याप स्पष्ट भूमिका घेतली नाही. या निर्णयामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे महाराष्ट्राने अधिक ठोस पावले उचलावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अलमट्टी धरणाचा विषय महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासोबतच पूरस्थिती आणि जलव्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजप आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून आगामी काळात जोरदार राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.

Electricity Blackout in Sri Lanka: त्रेतायुगात हनुमानाने जाळली होती लंका; आता कलियुगात

Web Title: Vishal patils serious allegations regarding the height increase of almatti dam nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

“आधीच रस्त्याची चाळण असूनही… “; एअर बसेसच्या निर्णयावर राजू पाटलांचा राज्य सरकावर हल्लाबोल
1

“आधीच रस्त्याची चाळण असूनही… “; एअर बसेसच्या निर्णयावर राजू पाटलांचा राज्य सरकावर हल्लाबोल

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;
2

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;

‘चांगले काम करणाऱ्यांच्या शासन कायम पाठिशी, इच्छाशक्ती असेल तर बदल…’; अजित पवार यांचं मोठं विधान
3

‘चांगले काम करणाऱ्यांच्या शासन कायम पाठिशी, इच्छाशक्ती असेल तर बदल…’; अजित पवार यांचं मोठं विधान

Vice President Election 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फडणवीसांनी केली पवारांना आणि ठाकरेंना फोनवरून विनंती
4

Vice President Election 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फडणवीसांनी केली पवारांना आणि ठाकरेंना फोनवरून विनंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.