
प्रदेश काँग्रेसच्या संगठन सृजन अभियानच्या निमित्ताने कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन नेरळ येथील साने हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या निरीक्षक राष्ट्रीय प्रवक्ता रागिणी नायक,पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस प्रदीप राव,मनीष गंडोरे,पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत,महिला जिल्हा अध्यक्ष ॲड श्रद्धा ठाकूर,जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाडगावकर,विवेक म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते नाना म्हात्रे,माजी उप सभापती अरविंद पाटील,जिल्हा डॉक्टर सील अध्यक्ष डॉ सदावर्ते, नेरळ महिला अध्यक्ष मंदा सोनटक्के आदी उपस्थित होते.जेष्ठ कार्यकर्ते अरविंद पाटील,विठ्ठल बदे,लखुबुवा ऐनकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्याचे स्वागत झाले.
ती 56 इंच छाती गेली कुठे? रागिणी नायक यांचा परखड सवाल
सर्वत्र कार्यकर्त्यांना चांगली वेळ असते त्यावेळी सर्व चांगले होत असते. पण कठीण परिस्थितीत आपल्याबरोबर कोण आहे हे पाहण्यासाठी आणि त्यातून संघटना वाढवण्यासाठी काँग्रेस मध्ये हे अभियान सुरू केले आहे.आज काँग्रेस काय आहे आणि काँग्रेस कशी वाढवायची आहे हे पाहण्याचं माझा प्रयत्न आहे.काँग्रेस ही पार्टी होती आणि ते देश स्वतंत्र करण्याचे आणि देश चालवण्याचे कार्य याचं काँग्रेस पक्षाने केले आहे.देशाला स्वतंत्र करण्याचे विचार काँग्रेसचे आहेत आणि त्यामुळे नेहरू,इंदिरा गांधी यांनी केले असून मोदींची 56 इंच छाती ही शोधावी लागते.
इंदिरा गांधींनी पाकिस्तानला ठिकाणावर लावले. चीन तिकडे आपल्या जमिनीत घुसत असताना मोदींची 56 इंच छाती कुठे आहे? असा परखड सवाल रागिणी नायक यांनी केला. राजीव गांधी यांनी माहिती तंत्रद्न्यान मध्ये मोबाईल क्रांती आणली आणि त्यावेळी त्यानं विरोध करायला हेच आडवाणी बैलगाडीमधून लोकसभेत आले होते. मोफत शिक्षण,महिलांचे 33 टक्के आरक्षण,माहिती अधिकार अशी अनेक कामं काँग्रेस पार्टीने केले. देशात महिलांवर अत्याचार सुरू आहेत,पण सत्ताधारी पोहचत नाहीत पण राहुल गांधी,प्रियंका गांधी हे पोहचत आहेत.निवडणूक आयोगानी शिक्क्यांवर निवडूक घ्या,आम्ही किती सक्षम आहोत हे तुम्हाला दाखवून देऊ असे आव्हान डॉ रागिणी नायक यांनी दिले. आताच्या घडीला काँग्रेस नेहरू गांधी यांची काँग्रेस सशक्त करण्याची गरज आहे.एक चे दोन आणि पुढे दोन चे चार करण्याची गरज असून काँग्रेस वाढवण्यासाठी आपण हातात हात घालून काम कार्यकर्त्यांनी करावं असं आवाहन यावेळी केलं गेलं.
“एनसीपी आणि पक्षातील वरिष्ठांनी पक्षाची वाट लावली”- महेंद्र घरत
एनसीपी निर्माण झाल्यावर कर्जतमध्ये पक्ष रसातळाला गेला. दुसरीकडे आम्ही अनेक वर्षे राष्ट्रवादी सोबत सत्तेवर होतो आणि तरीदेखील रायगड जिल्ह्यात कार्यकर्त्यांना सत्तेची कोणतीही पदे मिळत नाहीत. विलासराव देशमुख,पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना ते दोन्ही काँग्रेस मधून सत्तेत असताना त्यांनी रायगड जिल्ह्यात येताना ते आले की जयंत पाटील नाहीतर तटकरे यांच्याकडे जायचे.काँगेस वाढवण्यासाठी पक्षाने ताकद दिली नाही आणि त्यामुळे कार्यकर्ते बाजूला गेले हे मान्य करावेच लागेल.झेंडा टिकवण्याचा काम कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते करीत आहेत, असं महेंद्र घरत यांनी सांगितलं.
संगठन सृजन अभियान यामुळे कार्यकर्ता अधिक पक्षाशी जोडला जाईल असे स्पष्ट केले. 1999पर्यंत् या तालुक्यात जिह्यातकाँग्रेस सक्षम होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला,त्यावेळी ही सर्व कार्यकर्ते तिकडे गेल्याने पक्ष खालच्या पातळीवर गेला आहे हे आम्हाला मान्य आहे. असं प्रदेश सरचिटणीस मनीष गणगोरे यांनी सांगितलं.कर्जत आदिवासी तालुका असून आमच्याकडे औद्योगिक वसाहती नसल्याने रोजगार नाही. त्याचवेळी तालुक्यात अन्य पक्ष आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, तरीदेखील आपले कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत. काँग्रेस पक्ष म्हणून आमचे कार्यकर्ते ठामपणे विरोधकांचा विरोधात उभे आहेत, असं तालुका अध्यक्ष संजय गवळी यांनी म्हटलं आहे.