
IND vs SL: गॉलमध्ये तिरंगा फडकला, राष्ट्रगीत घुमलं; 600व्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचा खास अंदाज
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भारत क्रीडाविश्वात आपली ओळख निर्माण करत आहे. आपण अनेकदा आपले राष्ट्रगीत ऐकतो आणि अनेकदा तिरंगा उंच फडकत असलेला पाहतो. टॉप्स योजनेला मोठे यश मिळाले आहे. खेलो इंडिया गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स, बीच गेम्स, विंटर गेम्स, क्रीडा प्रशिक्षण, स्पोर्ट्स न्यूट्रिशन किंवा स्पोर्ट्स मेडिसन असो, भारत वेगाने प्रगती करत आहे.’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘भारताची कामगिरी सातत्याने सुधारत आहे आणि २०३६ ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारत एक प्रबळ दावेदार आहे.’ त्यांनी असेही सांगितले की, ‘भारत २०३० मध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करेल. ऑलिम्पिकमध्ये सुमारे ४० क्रीडा प्रकार आणि अंदाजे ३५० स्पर्धा असतात. ही खेदाची बाब आहे की, आपण पात्रही ठरू शकत नसल्यामुळे यापैकी किमान दोन-तृतीयांश स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकत नाही.’
ते पुढे म्हणाले की, ‘भारताला क्रीडा विभागात पुढे जाण्यासाठी आणि २०३६ च्या ऑलिम्पिकमध्ये शक्य तितक्या जास्त क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा करण्यासाठी खेळाडू तयार असल्याची खात्री करण्याची गरज आहे. लहान वयातच प्रतिभा ओळखून तिला प्रोत्साहन देण्याच्या या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून ही टॅलेंट हँट मोहीम राबवली जाईल.’
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘आम्ही ठरवले आहे की २०३६ पर्यंत आपण जगातील किमान तीन-चतुर्थांश क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले पाहिजे. आम्ही ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी देशव्यापी टॅलेंट हँट मोहीम सुरू करत आहोत. ५ ते १५ वयोगटातील मुलांमधील प्रतिभा ओळखण्यासाठी प्रत्येक गावात आणि शाळेत ही मोहीम राबवली जाईल, जेणेकरून देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभा शोधता येईल. त्यांना जागतिक दर्जाचे खेळाडू बनण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल.’
भारत गुजरातच्या अहमदाबाद शहरात २०३० च्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्याच्या तयारीत असताना ही घोषणा करण्यात आली आहे. २०२६ च्या ग्लासगो खेळांच्या समारोप समारंभात यजमानपद औपचारिकपणे भारताकडे सोपवण्यात आले होते. भारत या स्पर्धेच्या १०० व्या हंगामाचे आयोजन करणार आहे.
IND vs SL: गॉलची पिच ठरवणार ‘गेम’! फलंदाज की गोलंदाज, कोणाला मिळणार साथ?