फोटो सौजन्य- pinterest
वासुदेव विनायक चतुर्थीचे व्रत पाळणाऱ्या लोकांनी नियमितपणे पूजा अर्चना करावी. असे केल्याने जीवनात अपेक्षित यश मिळते, अशी धार्मिक श्रध्दा आहे. तसेच तुम्हाला येत असलेल्या समस्या दूर होतील. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे जाणून घ्या
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात शनिवार, 21 मार्च रोजी रात्री 11.56 वाजता सुरू झाली आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार 22 मार्च रोजी रात्री 9.16 मिनिटांनी होणार आहे. उदयतिथीनुसार रविवार, 22 मार्च रोजी हे व्रत पाळले जाणार आहे. चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह मुहूर्त सकाळी 11.15 मिनिटांपासून दुपारी 1.41 मिनिटांपर्यंत असेल. तर चंद्रदर्शनाची वेळ रात्री 8.15 मिनिटांपासून 10.15 मिनिटांपर्यंत असेल.
यावर्षी वासुदेव चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी रवी योग आणि भद्रावास योग विशेष महत्त्वपूर्ण असतील. रवी योग रात्री १०:४२ पर्यंत प्रभावी राहील, तर भद्रावास योग सकाळी १०:३६ वाजता सुरू होऊन रात्री ९:१६ पर्यंत राहील. या योगांदरम्यान गणपतीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्यामुळे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
वासुदेव चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर प्रार्थना करा. नंतर विधिपूर्वक पूजा करा. पूजेच्या वेळी दुर्वा, सिंदूर, लाल फूल, बार्ली, सुपारी इत्यादी गोष्टी अर्पण करा. यावेळी नेवेद्यासाठी गणपती बाप्पाला मोदक, केळ, हंगामी फळ, बेसनाचे लाडू, पुरणपोळी इत्यादी गोष्टी अर्पण करा. असे केल्याने गणपती बापाचा आर्शिवाद व्यक्तीवर राहतो आणि जीवनात सुख समृद्धी राहते.
चतुर्थीच्या दिवशी पूजेदरम्यान तुळशीची पाने अर्पण करु नये. पौराणिक कथेनुसार तुळशी आणि गणपतीने एकमेकांना शाप दिला होता. ज्यामुळे गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही. काळ्या रंगांचे वस्त्राने पूजा करू नये. कारण काळ्या रंगांचा संबंध नकारात्मकताशी संबंधित आहे.
चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊ नये. धार्मिक श्रद्धेनुसार असे केल्याने व्यक्तीला खोट्या गोष्टी वादविवादाचा सामना करावा लागू शकतो. याव्यतिरिक्त कोणाशी देखील भांडण करणे, वादविवाद आणि एखाद्याचा अपमान करू नये. नाहीतर तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही.
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला वासुदेव विनायक चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा केली जाते. तसेच, या दिवशी दानधर्म केल्याने विशेष पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: सकाळी लवकर उठून स्नान करून गणपतीची विधिवत पूजा करा, बाप्पाला 21 दुर्वा आणि लाल फुले अर्पण करा, गंध, अक्षता, फुले अर्पण करून आरती करा, “ॐ गं गणपतये नमः” मंत्राचा जप किमान 108 वेळा करा.
Ans: या दिवशी गणपतीसोबत श्रीकृष्ण (वासुदेव) यांचाही स्मरण केले जाते. त्यामुळे भक्तांना बुद्धी, यश आणि आध्यात्मिक उन्नती मिळते.
Ans: मोदक हा गणपतीचा आवडता प्रसाद आहे. याशिवाय लाडू, केळी, नारळ अर्पण करणे शुभ मानले जाते.






