
फोटो सौजन्य- pinterest
होळी आणि धुलिवंदन हे सलग दोन दिवस साजरे होणारे पण अर्थाने भिन्न असे सण आहेत. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी ही वाईट प्रवृत्तीच्या नाशासाठी पेटवली जाते, तर धुलीवंदन हा होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांना रंग, राख किंवा माती लावून आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. यावेळी होळी सोमवार, 2 मार्च रोजी आहे तर मंगळवार, 3 मार्च रोजी धुलिवंदन आहे.
होळी आणि धुलिवंदन हे दोन वेगळे दिवस असूनही खूप जण आजूनही या दिवसांमध्ये गल्लत करतात. म्हणूनच होळी आणि धुलिवंदन यातील नेमका फरक काय आणि हा दिवस साजरा करण्यामागील कारण काय ते जाणून घेऊया
होळी म्हणजेच होलिकादहन या दिवशी होळी पेटवली जाते. हा दिवस फाल्गुन पौर्णिमेला येतो. होळी पेटवून नकारात्मक शक्तींचा नाश होतो असा समज आहे. या दिवशी रंग खेळले जात नाहीत. गावाबाहेर होळीच्या दिवशी लाकूड एकत्र केले जातात आणि त्याला नारळाचं तोरण बांधल जातं. होळीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. उत्तम आरोग्यासाठी, संतती प्राप्तीसाठी, कामातील अडथळे दूर करण्यासाठी होळीसमोर गाऱ्हाण देखील घातले जाते. अनेक ठिकाणी होळी पेटवल्यानंतर बोंबा मारण्याची देखील पद्धत आहे. बोंबा मारत प्रदक्षिणा घालून होळीला नारळ देखील अर्पण केला जातो. होळी साजरी करण्यामागे एक आख्यायिका फार प्रचलित आहे. ही कथा आहे भक्त प्रल्हादाची आणि हिरण्यकश्यपुची.
हिरण्यकश्यपु हा अत्यंत अहंकारी असा राजा होता. तो स्वतःला देवांपेक्षाही श्रेष्ठ मानत असे. लोकांनी केवळ आपलीच पूजा करावी असे त्याला कायम वाटे. त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. हिरण्यकश्यपुला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याच्या विष्णूभक्तीवर चिडून प्रल्हादला मारण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. प्रल्हादला मारण्यासाठी त्याने आपली बहीण होलिकेला बोलावले. होलिकेला अग्नीत न जळण्याचे वरदान होते. साक्षात ब्रम्ह देवांना प्रसन्न करून तिने हे वरदान मागितले होते. होलिकेच्या संरक्षणासाठी तिला तो वरदान साक्षात ब्रम्ह देवांनी दिला होता. प्रल्हादला मारण्याच्या हेतूने ती ज्यावेळी त्याला मांडीवर घेऊन चितेवरती बसली त्यावेळी मात्र ती त्या आगीत जळून भस्म झाली. आपल्या वरदानाचा दुरुपयोग केल्यामुळे तिला हे मरण आलं होतं त्यामुळेच या होलिकेत वाईट गोष्टींचा नाश होतो, असा समज आहे.
होळीनंतर येणारा दिवस म्हणजे धुलिवंदन याला अनेक ठिकाणी धुळवड असेही म्हणतात. हा सण रंगांने साजरा केला जातो. अनेक ठिकाणी पेटवलेल्या धुळीची राख अंगांला लावून मगच धुळवड खेळली जाते. हा दिवस हिरण्यकश्यपुचा वध आणि प्रल्हादाच रक्षण म्हणजे सत्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. शिवाय काही ठिकाणी राधा कृष्णाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून या दिवसाला मान आहे. सर्व भेदभाव विसरून लोक एकत्र येतात आणि रंगांच्या माध्यमातून एकमेंकांच्या आयुष्यात आनंद भरतात. थोडक्यात, धुलिवंदन हा कडू आठवणी होळीत जाळून नवीन आनंदी सुरुवात करण्याचा सण आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: होय. होळी आणि धुलिवंदन हे सलग दोन वेगवेगळे दिवस मानले जातात. पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते, तर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते.
Ans: होळी: नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचे स्वागत करण्याचा दिवस. धुलिवंदन: प्रेम, बंधुता आणि आनंद साजरा करण्याचा दिवस.
Ans: होळीच्या दिवशी विधीपूर्वक पूजा, होलिका दहन आणि प्रदक्षिणा केली जाते. धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळणे, गोडधोड खाणे आणि सामाजिक उत्सव साजरा केला जातो.