होळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो. हिंदू धर्मात धुळवडीच्या आधीची पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं. होळीच्या पवित्र अग्नीत नकारात्मकता जाळून नव्या ऊर्जेची सुरुवात करण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या राशीनुसार होळीची पूजा केल्यास विशेष शुभफल मिळू शकते, अशी श्रद्धा आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, असं सांगितलं जातं की, राशीनुसार होलिकामातेची पूजा केल्यास शुभफल प्राप्त होतात.
मेष रास
या राशीच्या मंडळींचा स्वामी मंगळ आहे. ही माणसं काहीशी धाडसी आणि शिष्ठ स्वभावाची असतात. त्यामुळे अनेकदा यांचं कामाच्या ठिकाणी किंवा सहकाऱ्यांची वाद होतात त्यामुळे यंदा नोकरीच्या ठिकाणी काम चांगलं व्हावं यासाठी या व्यक्तींनी हनुमानाची उपासना करून होळीच्या अग्नीत गुळ-तांदूळ अर्पण करावेत.
वृषभ रास
राशींसाठी महालक्ष्मी पूजन आणि साखर-दूध अर्पण लाभदायक मानले जाते. वृषभेच्या मंडळींचा शुक्र स्वामी आहे. शुक्र बलवान होण्यासाठी महालक्ष्मी देवीची उपासना फायदेशीर ठरते.
मिथुन रास
या राशीच्या लोकांनी गणपतीची पूजा करून दूर्वा अर्पण करावी.मिथुनेचा स्वामी हा बुध आहे त्यामुळे या मंडळींना श्री गणेशाची पूजा करणं फायदेशीर ठरतं.
कर्केच्या मंडळींचा राशीस्वामी चंद्र असल्याने ही माणसं मनाने हळवी असतात. य़ा त्यामुळे कौटुंबिक शांतता वाढते. राशीच्या व्यक्तींनी भगवान शंकराला जलाभिषेक करावा. आणि होळीच्या अग्नीला पांढऱ्य़ा रंगाची मिठाई अर्पण करावी, याने कौटुंबिक शांतता मिळते.
सिंह रास
यांचा सूर्यदेव राशीस्वामी असल्याने ही माणसं अत्यंत तेजस्वी असतात. या राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि गव्हाचे दाणे होळीत अर्पण करावेत.
कन्या रास
राशीच्या व्यक्तींनी गणेशपूजन करून हिरव्या वस्तूंचे दान करणे किंवा हिरव्या वस्तू होळीत अर्पण करणं फायदेशीर ठरतं.
तूळ रास
तुला राशींसाठी महालक्ष्मीची उपासना आणि सुगंधी फुले अर्पण करणे लाभदायक असते. शुक्राच्या प्रभावाखाली असलेल्या या मंडळींनी होळीच्या अग्नीत पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.
वृश्चिक रास
राशीच्या लोकांनी हनुमान किंवा भैरवाची पूजा करून नारळ अर्पण करावा.
धनु राशींसाठी विष्णूपूजन आणि पिवळ्या वस्तूंचे दान शुभ मानले जाते. तर मकर राशीच्या व्यक्तींनी शनीदेवाची पूजा करून काळे तीळ अर्पण करावेत.कुंभ राशींसाठी शिवपूजन उपयुक्त ठरते, तर मीन राशीच्या लोकांनी विष्णू किंवा दत्तात्रेयाची उपासना करावी.
होळीच्या दिवशी श्रद्धेने पूजा, मंत्रजप आणि दान केल्यास जीवनातील अडथळे दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे. श्रद्धा आणि सकारात्मक विचारांसह साजरी केलेली होळी आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येते.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.






