फोटो सौजन्य- pinterest
जीवितपुत्रिका व्रत यावेळी 14 सप्टेंबर रोजी आहे. हे व्रत दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी पाळले जाते. हे व्रत प्रामुख्याने बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या भक्तीने पाळले जाते.
जीवितपुत्रिका हे व्रत सर्वांत कठीण व्रत मानले जाते. हे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी पाळले जाते. हे व्रत जितिका या नावाने देखील ओळखले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून हे व्रत पाळले जात आहे. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, ज्यांना मुलं आहेत त्या महिला हे व्रत पाळू शकतात. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी या दिवशी काही विशेष उपाय देखील केले जातात. जीवितपुत्रिका व्रताबद्दल जाणून घेऊया.
मुलांच्या आनंद आणि दीर्घाष्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत जास्त करुन बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश या पूर्वेकडील राज्यांमध्ये पाळले जाते. यावेळी जीवितपुत्रिका व्रत 14 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे.
हिंदू मान्यतेनुसार, जीवितपुत्रिका व्रत कलियुगाच्या सुरुवातीला सुरू झाले. या वेळी जिमुतवाहन नावाचा राजा कुठेतरी जात असताना त्याला एका रडणाऱ्या महिलेचा आवाज ऐकू आला. ज्यावेळी ती त्या राजाकडे गेली तेव्हा तिला कळले की भगवान विष्णूचे वाहन आज तिच्या मुलाला घेऊन जाईल आणि त्याला खाईल. त्यानंतर राजाने तिला आश्वासन दिले की, तो तिच्या मुलाऐवजी गरुडाचा आहार होईल. जेव्हा त्याने स्वतःला त्या महिलेच्या मुलाच्या जागी सादर केले, तेव्हा गरुड राजाच्या कृपेने प्रसन्न झाला आणि त्याने त्याला वैकुंठाला जाण्याचा आशीर्वाद दिला आणि उर्वरित मुलांनाही पुनरुज्जीवित केले.
जीवितपुत्रिका व्रताच्या दिवशी जिमुतवाहनाच्या पूजेचे महत्त्व आहे. जिमुतवाहन हा एक गंधर्व राजपुत्र होता ज्याने नागपुत्राला वाचवण्यासाठी गरुडाला स्वतःचे बलिदान दिले होते.
या व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी महिलांनी पिंपळाच्या झाडाखाली बसून कथा ऐकावी किंवा वाचावी. त्यानंतर झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. पिंपळाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानले जाते, जे सर्व दुःख दूर करते.
उपवास झाल्यानंतर, गरीब, गरजू आणि ब्राह्मणांना अन्न आणि कपडे दान करा. असे केल्याने शुभ फळे आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)