
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यांना सर्वांत मोठे स्थान आहे. आजही अनेक राजकीय पंडित, रणनीतीकार, राजकीय चाणक्य या युद्धाचा अभ्यास करून आपले डावपेच आखतात. महाभारत हे द्वापारयुगात घडले होते. कुरुक्षेत्रावर लढल्या गेलेल्या महाभारताच्या युद्धात कौरव आणि पांडव एकमेकांच्या विरोधात होते. कौरव अधर्माच्या बाजूने होते तर पांडव धर्माची बाजू सांभाळत होते, असं म्हटलं जातं. श्रीकृष्णाच्या उपस्थितीत झालेल्या महाभारत युद्धादरम्यान अनेक विशेष घटना घडल्या. त्यातून आजही आपल्याला ज्ञान आणि शिकवण मिळते.
महाभारतातील युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात भीम आणि दुर्योधन यांच्यात गदायुद्ध झालं होतं. भीम आपल्या गदेने दुर्योधनाच्या शरीरावर सतत प्रहार करत होता. आई गांधारीने डोळ्यांवरची पट्टी काढून दुर्योधनाच्या शरीराकडे पाहिलं होतं. गांधारीच्या दिव्य दृष्टीमुळे दुर्योधनाचं शरीर जणू वज्राइतकं कणखर बनलं होतं. म्हणजे ते इतकं कणखर झालं होतं की कोणताही मार सहन करू शकत होतं. पण गांधारीने सांगूनही दुर्योधन आईला भेटायला जाताना जांघेत वस्त्र परिधान करून गेला होता त्यामुळे जांघेचा भाग वगळता त्याचं सगळं शरीर कणखर झालं होतं. ही बाब श्रीकृष्णाला माहीत होती. महाभारताच्या युद्धात पांडवांना धर्मासाठी मदत करणाऱ्या श्रीकृष्णाने यावेळी सुद्धा मदत व मार्गदर्शन करून पांडवाचे संरक्षण केले होते. श्रीकृष्णाने भीमाला दुर्योधनाच्या जांघेत प्रहार करण्याचा इशारा केला. श्रीकृष्णाकडून इशारा मिळताच भीमाने दुर्योधनाच्या जांघेत प्रहार करण्यास सुरुवात केली. तिथे प्रहार होताच दुर्योधन जखमी झाला.
भीमाच्या गदा हल्ल्याने दुर्योधन गंभीर जखमी झाला होता. तो वेदनांनी विव्हळत असताना तिथे अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य आले. दुर्योधनाला वेदना होत असल्याचं बघून मित्र अश्वथामाने पांडवांचा नाश करण्याचा संकल्प केला. त्यांना मारण्यासाठी तो पांडवांच्या छावणीत पोहोचला. पण, अश्वथामाच्या हातून पांडवांच्या ऐवजी त्यांच्या झोपलेल्या मुलांचा अंत झाला.
ही बातमी सांगायला दुर्योधनाकडे गेला. पांडवांच्या सर्व मुलांच्या मृत्यूने संपूर्ण कुरुवंशाचा नाश झाला. जखमी झालेल्या दुर्योधनाने अश्वथाम्याची ही बातमी ऐकून आपला प्राण सोडला होता. कुळाचा नाश झाल्याचे कळताच दुर्योधनाने प्राण सोडले. तरी शेवटचा वंशज मात्र, जिवंत होता. अभिमन्यूची पत्नी उत्तराने परिक्षित नावाच्या मुलाला जन्म दिला होता. दुर्योधनाला पांडव पुत्रांना मारले म्हणून दुःख झाले. तर काही ग्रंथांमध्ये आनंद झाल्याचे मतप्रवाह आहेत.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या शेवटी गदायुद्धात भीम आणि दुर्योधन यांच्यात भीषण लढत झाली. युद्धाच्या नियमांनुसार कंबरखाली वार करणे निषिद्ध होते, पण श्रीकृष्ण यांच्या सूचनेनुसार भीमाने दुर्योधनाच्या मांडीत गदा मारली आणि त्याचा पराभव करून त्याचा अंत केला.
Ans: आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अश्वत्थामा याने रात्रीच्या वेळी पांडवांच्या छावणीवर हल्ला केला. त्यावेळी त्याने पांडव समजून द्रौपदीच्या पाच मुलांची हत्या केली. ही कृती युद्धनियमांच्या विरुद्ध असल्याने ती त्याची मोठी चूक मानली जाते.
Ans: दुर्योधनाच्या मृत्यूनंतर कौरव पक्ष पूर्णपणे पराभूत झाला. तरीही अश्वत्थामाने सूडाच्या भावनेने पांडवांच्या शिबिरावर हल्ला करून युद्धानंतरही हिंसाचार घडवून आणला.