Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahavir Jayanti 2025: महावीर जयंती नक्की ९ की १० एप्रिलला? जाणून घ्या योग्य तारीख व महत्व

महावीर जयंती जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर यांच्या जन्माच्या स्मरणार्थ जैन समुदाय साजरी करतो. या वर्षी महावीर जयंती कोणत्या तारखेला साजरी करण्यात येणार, पंचशील तत्वे आणि त्यांचे महत्व काय ?जाणून घेऊयात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2025 | 11:32 AM
MAHAVIR (फोटो सौजन्य- PINTEREST)

MAHAVIR (फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us
Close
Follow Us:

महावीर जयंती जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर यांच्या जन्माच्या स्मरणार्थ जैन समुदाय साजरी करतो. महावीर जयंती चैत्र शुक्ल त्रयोदशीला साजरी केली जाते. हे जैन धर्माचे २४ वे आणि अंतिम तीर्थंकर होते. महावीर जयंतीच्या दिवशी भगवान महावीरांचे अनुयायी त्यांच्या शिकवणीचे स्मरण करतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि भक्तीभावाने विविध धार्मिक विधी करतात. या वर्षी महावीर जयंती गुरुवारी १० एप्रिलला साजरी केली जाणार आहे.

Kamada Ekadashi: आज कामदा एकादशी; जाणून घ्या श्री हरीच्या पूजेच्या मुहूर्ताची वेळ अन् पद्धत

काय आहे महावीर स्वामींचे पंचशील तत्व?

महावीर स्वामींनी निर्माण केलेले पंचशील तत्व हे जैन धर्माच्या मूलभूत नैतिक आणि नैतिक तत्वांपैकी एक आहे. ही तत्वे जीवनात अहिंसा, सत्य, संयम आणि आत्मशुद्धीच्या मार्गाचे अनुसरण करण्यावर भर देतात:

अहिंसा- प्रत्येक परिस्थिती मध्ये हिंसा पासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. त्यांनी सांगितलं की चुकूनही कोणाला दुखवू नये.
सत्य- जो व्यक्ती बुद्धिमान असतो आणि सत्याशी जुडलेला असतो तो मृत्यू सारखे कठीण मार्गांना देखील ओलांडतो. म्हणून त्यांनी सैदव लोकांना सत्य बोलण्याची प्रेरणा दिली.

अस्तेय- जे अस्तेयचे पालन करतात ते परवानगीशिवाय कोणत्याही स्वरूपात काहीही स्वीकारत नाहीत. अशे व्यक्ती नेहमी संयमित राहतात आणि केवळ तेच वस्तू स्वीकारतात जे स्वेच्छेने दिले जाते.

ब्रह्मचर्य- हे तत्व अवलंब करण्यासाठी जैन लोकांना पवित्रता आणि संयमाच्या गुणांचे पालन करावे लागतात. ज्यामध्ये ते कोणत्याही प्रकारच्या लैंगिक क्रियाकलापांपासून दूर राहतात.

अपरिग्रह- असे मानले जाते, अपरिग्रहाचा अभ्यास केल्याने जैन लोकांची आत्मिक चेतना विकसित होते आणि दुनियेतील भौतिक वस्तू आणि सुख आणि चैनीपासून दूर राहतात.

कशी साजरी केली जाते महावीर जयंती?

महावीर जयंतीच्या निमित्ताने जैन अनुयायी सकाळी प्रभात फेरी काढतात आणि त्यानंतर भव्य मिरवणूक काढून पालखी यात्रा काढली जाते. यानंतर महावीर स्वामींना सोन्या-चांदीच्या भांड्यांनी अभिषेक केला जातो. शिखरांवर ध्वज फडकवले जातात. जैन समुदायाकडून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आणि थाटामाटात महावीरांची जयंती साजरी केली जाते.

Web Title: Mahavir jayanti 2025 is mahavir jayanti exactly on april 9 or 10 know the correct date and importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • dates
  • hindu religion
  • religion news

संबंधित बातम्या

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
1

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म
2

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

Mahabharat Katha: ‘त्या’ दिवशी सूर्यग्रहण नसते तर अर्जुनाने आत्महत्या करून गमावले असते प्राण, थरारक कथेचे सत्य
3

Mahabharat Katha: ‘त्या’ दिवशी सूर्यग्रहण नसते तर अर्जुनाने आत्महत्या करून गमावले असते प्राण, थरारक कथेचे सत्य

Surya Gochar 2025: सिंह राशीत होणार सूर्य गोचर, 5 राशींना मिळणार जबरदस्त लाभ; पैसाच पेसा येणार!
4

Surya Gochar 2025: सिंह राशीत होणार सूर्य गोचर, 5 राशींना मिळणार जबरदस्त लाभ; पैसाच पेसा येणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.