
फोटो सौजन्य- pinterest
रामनवमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी श्री रामांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. मर्यादा पुरूषोत्तम राम यांना हा सण समर्पित आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. यावर्षी रामनवमी गुरुवार, 26 मार्च रोजी आहे. रामनवमीला काही खास उपाय केल्यास अनेक अडचणी दूर होतात, संकटे नष्ट होतात.
जर मुलबाळ होण्यास अडचणी येत असतील तर रामनवमीला लाल कपड्यात नारळ गुंडाळून सीतेला अर्पण करावे, नारळ अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
रामनवमीला सुख-समृद्धीसाठी ११ दिवे दारात लावावेत.
रामनवमीला श्री रामांना सात धान्ये अर्पण करावीत, यामुळे घरातील संपत्ती वाढण्यास मदत मिळते.
जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या आजाराशी झुंज देत असाल तर यापासून सुटका होण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे. हे पठण तुम्ही जर हनुमान मंदिरात केलेत तर उत्तम राहील.
जर तुमच्या लग्नाला उशिरा होत असेल किंवा लग्न जुळण्यास विलंब होत असल्यास रामनवमीला प्रभू श्रीराम आणि सीतेला हळद, कुंकू आणि चंदन अर्पण करावेत.
रामनवमीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, या दिवशी सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागवा.
रामनवमीच्या दिवशी खोटे बोलू नका. या दिवशी नेहमी खरे बोला.
राम नवमीच्या दिवशी कोणाशीही भाडू नका. या दिवशी शांतता आणि सौहार्द राखा.
रामनवमीच्या दिवशी रामचरितमानस पठण करणे खूप शुभ मानले जाते.
जर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर रामनवमीच्या दिवशी श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करणेदेखील फायदेशीर आहे
रामनवमीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्न, कपड़े आणि पैसे दान करा.
रामनवमीच्या दिवशी उपवास करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार या दिवशी उपवास करू शकता.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: रामनवमीला हे उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते: सकाळी लवकर उठून स्नान करून घरात स्वच्छता ठेवावी, श्रीराम यांची पूजा करून रामरक्षा स्तोत्र पठण करावे, "श्रीराम जय राम जय जय राम" या मंत्राचा जप करावा, गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे, राम मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे
Ans: रामनवमीला हा मंत्र जपणे अत्यंत प्रभावी मानले जाते: "श्रीराम जय राम जय जय राम" हा मंत्र सतत जपल्याने मानसिक शांती मिळते आणि अडचणी दूर होतात.
Ans: मुख्यतः श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची पूजा केली जाते.