
फोटो सौजन्य- chatgpt
रावणाचा पराभव करून धर्माचा विजय झाल्यानंतर श्रीरामांनी माता सीता, लक्ष्मण, सुग्रीव, विभीषण आणि इतरांसह पुष्पक विमानातून अयोध्येकडे परतण्याचा निर्णय घेतला. 14 वर्षांचा वनवास संपत आला होता. अयोध्येतील जनतेला, विशेषतः भरताला, या दिवसाची प्रतीक्षा होती. भरताने रामांच्या वनवासकाळात स्वतः राज्य स्वीकारले नव्हते. त्यांनी श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून नंदिग्राम येथे अत्यंत साधेपणाने जीवन जगत राज्यकारभार केला. असे सांगितले जाते की भरताने मनोमन संकल्प केला होता चौदा वर्षांची मुदत संपली आणि प्रभू परतले नाहीत, तर तो जगणार नाही. ही गोष्ट श्रीरामांना माहीत होती.
श्रीराम थेट अयोध्येत जाऊ शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. कारण त्यांच्यासाठी विजयापेक्षा महत्त्वाची गोष्ट होती, आपल्या प्रियजनांची मनःस्थिती. भरताच्या अंतःकरणात काय चालले आहे? तो अजूनही त्याच निष्ठेने वाट पाहत आहे का? त्याच्या मनात काही वेदना किंवा निराशा तर नाही? हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सर्वांत योग्य व्यक्तीची निवड केली ती हनुमानाची..
रामायणातील प्रत्येक निर्णायक प्रसंगात हनुमानाने स्वतःला सिद्ध केले. सीतेचा शोध घेण्यासाठी केले अतुलनीय पराक्रम. समुद्र लांघणे, लंकेत प्रवेश करून रावणाला एक इशाराच दिला. मोठ्या धाडसाने लंकेत घुसून रामाचा संदेश देणे सीतामाईला देणे, लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे, युद्धात सहाय्य केले. ही सर्व कार्ये अशक्य मानली जात होती. पण हनुमानाने ती पूर्ण केली. त्यामुळे श्रीरामांना माहीत होते. हनुमान जे काम हातात घेईल ते पूर्णत्वाला नेईल.
रामायणात हनुमानाचे वर्णन “बुद्धिमतां वरिष्ठम्” असे केले जाते, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ. भरताला बातमी सांगणे म्हणजे केवळ माहिती देणे नव्हते. त्याला आधी शांत करणे, त्याची अवस्था पाहणे, योग्य क्षणी आनंदवार्ता देणे, हे काम भावनिक आणि सूक्ष्म होते. हे हनुमानच करू शकत होता.
हनुमानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने स्वतःला कधी नायक मानले नाही. त्याच्यासाठी एकच ओळख होती.. “मी रामाचा दूत आहे.” त्यामुळे श्रीरामांना त्याच्यावर संपूर्ण विश्वास होता.
हनुमान जेव्हा भरताकडे पोहोचला, तेव्हा त्याने प्रथम स्वतःची ओळख दिली. त्याने सांगितले “प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणांसह परत येत आहेत.” हे ऐकताच भरताच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. हा केवळ संदेश नव्हता तर चौदा वर्षांच्या विरहाचा अंत होता.
नात्यांमध्ये विश्वास सर्वांत मोठा असतो. मोठी जबाबदारी नेहमी पात्र व्यक्तीलाच मिळते. भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे; तर निःस्वार्थ सेवा. जो अहंकार सोडतो त्याच्यावर मोठा विश्वास ठेवला जातो. म्हणूनच रामायणात श्रीराम आणि हनुमान यांचे नाते राजा व सेवकाचे नसून ईश्वर आणि परमभक्ताचे मानले जाते. शेवटी असे म्हणतात “रामाचे कार्य ज्याने स्वतःचे मानले, त्यालाच रामाने स्वतःच्या हृदयात स्थान दिले आणि तो म्हणजे हनुमान.”
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: श्रीरामांना भरताची मनःस्थिती जाणून घ्यायची होती. हनुमान बुद्धिमान, विश्वासू आणि योग्य प्रकारे संदेश पोहोचवणारे असल्यामुळे त्यांनी त्याची निवड केली.
Ans: भरताच्या मनात काही दुःख किंवा निराशा तर नाही ना, हे जाणून घेण्यासाठी श्रीरामांनी आधी हनुमानाला पाठवले.
Ans: हनुमान हे भक्ती, सेवा, निष्ठा आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जातात. रामायणातील अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये त्यांची मोठी भूमिका होती.