
फोटो सौजन्य- pinterest
भारताच्या संतपरंपरेमध्ये अनेक महान संतांनी आपल्या जीवनातून समाजाला अध्यात्म, मानवता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. अशाच संतांमध्ये शिर्डीचे साईबाबा हे अत्यंत पूजनीय आणि श्रद्धास्थान मानले जातात. साईबाबांनी आपल्या साध्या जीवनातून आणि दिव्य कृतीतून लाखो भक्तांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला. ते दैवी शक्तीचे धनी असूनही अत्यंत साधेपणाने जीवन जगत असत. त्यांच्या जीवनातील एक विशेष गोष्ट म्हणजे ते दररोज गावात जाऊन भिक्षा मागत असत.
साईबाबांना माननारा भक्तवर्ग खूप मोठा आहे. दर गुरुवारी किंवा सणावाराला साईंच्या शिर्डीत भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. दान पेटीत सोनं नाणं दान करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आज दागदागिन्यांनी जरी शिर्डीत देवस्थान सजलेलं असलं तरी साईबाबाचं आयुष्य खूप साधं आणि सरळ होतं. हातात झोळी घेऊन ते गावात भिक्षा मागत असतं. गावकरी जे जसं जमेल ते तसं त्यांना भिक्षा देत होते.
गावकऱ्यांना नेहमी प्रश्न पडायचा साईनाथांमध्ये दैवी शक्ती आहे तर मग ते भिक्षा का मागतात. न राहून त्यांना एका भक्ताने विचारलं. बाबा तुमच्यामध्ये सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे तर मग तुम्ही असे भिक्षा का मागता त्यावेळी साईबाबा म्हणाले, भिक्षा मागणं म्हणजे माझी गरिबी नाही तर ही माझी साधना आहे. ज्या भागातून मला भिक्षा मिळते त्या घरात लक्ष्मी राहो, असा आशीर्वाद मी देतो. मग तो कोणत्याही जाती धर्मांचा किंवा गरीब श्रीमंत का असावा. जो मनाने स्वच्छ आणि सुंदर आहे अशा माणसांच्या पाठीशी परमेश्वर कायम असतो. माणुसकी हाच खरा धर्म हे साईबाबांनी जगाला पटवून दिलं.
साईबाबांसाठी भिक्षा ही केवळ अन्न मिळवण्याची पद्धत नव्हती. त्यामागे एक गहन आध्यात्मिक संदेश दडलेला होता. ते स्वतःला कोणत्याही संपत्ती, अहंकार किंवा वैभवापासून दूर ठेवत असत. भिक्षा मागून त्यांनी समाजाला हे शिकवले की संतासाठी साधेपणा आणि नम्रता हीच खरी संपत्ती आहे.
आजच्या धकाधकीच्या आणि भौतिकवादी जीवनात साईबाबांची शिकवण अधिक महत्त्वाची वाटते. संपत्ती, प्रतिष्ठा आणि स्पर्धेच्या युगात त्यांनी साधेपणा, नम्रता, सेवा आणि प्रेम यांचे महत्त्व सांगितले.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: भिक्षा मागण्यामागे त्यांचा उद्देश नम्रता, अहंकारत्याग आणि अन्नदानाचे महत्त्व समाजाला शिकवणे हा होता.
Ans: ते शिर्डीतील काही ठराविक घरांमध्ये दररोज भिक्षा मागण्यासाठी जात असत.
Ans: ते मिळालेल्या अन्नाचा काही भाग भक्त, गरजू लोक आणि प्राण्यांमध्ये वाटत असत.